शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

शासन नोंदीत अतिवृष्टी झालेल्या गावच्या विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 7:51 PM

एकीकडे पूर तर दुसरीकडे कोरड्या विहिरी

पूर्णा (परभणी) :  तालुक्यातील चुडावा मंडळात शासनाच्या दफ्तरी  अतिवृष्टीची नोंद आहे. मात्र, अजूनही या गावातील विहिरी कोरड्या पडलेल्या दिसून येत आहेत. 

राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती भयावह आहे.मात्र, मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटली तरी तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. यातच चुडावा मंडळात  दि. 3 ऑगस्टला बारा तासात 71 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे हा भाग अतिवृष्टीमध्ये नोंदवण्यात आला. परंतु, या भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. 

अगोदरच या भागात पाऊस नसल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. अनेकांच्या पेरण्या ही झाल्या नाही. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या भरवश्यावर पेरण्या केलेली  पिके आज जरी तग धरून दिसत आहेत. पुढील काळात पुरेसा पाऊस न पडल्यास ही पिकेही हातातून जाण्याची शक्यता आहे.शुक्रवारी एकीकडे पूरस्थितीच्या झळकत असताना या परिसरात कोरड्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. येथील शेतकरी कैलास ज्ञानेशवर देसाई,गजानन जळबाजी देसाई,दिनकर बालासाहेब देसाई,रमेश बालासाहेब देसाई यांच्या समाईक विहिरीचे खोदकाम चालू असून राज्यातील विसंगत स्थितीचे विदारक दर्शन घडून येत आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जल स्त्रोताना अजून पाणी आले नाही. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी या भागात मोठया पावसाची गरज आहे. - किशोर देसाई, युवा शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसdroughtदुष्काळ