शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:37 IST

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ 

ठळक मुद्देबोंदरगाव शिवारातील स्थिती शेतकऱ्यांवर वांझ प-हाट्या उपटण्याची आली वेळ

- सुभाष सुरवसे, सोनपेठ, जि. परभणी 

परतीच्या  पावसाने दगा दिला. त्यामुळे जेमतेम तग धरीत उगवलेल्या कपाशीला बाळसेच आले नाही. झाडे जेमतेम वाढली, पण फुले-बोंडे लागली नाही. त्यामुळे कापूस वेचणीचा हंगामच यंदा नशिबी नाही! पहिल्याच वेचणीच्या काळात प-हाट्या उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून प-हाट्याचे जळतन करावे लागत आहे़ सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ 

बोंदरगाव परिसरातील शेत शिवारांमध्ये फेरफटका मारताना कापसाची पिके चक्क वाळलेली होती़ बोंडे, पाते गळ सुरू होती़ या भागात पहिली वेचणीही हाती आली नाही़ त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापसाच्या प-हाट्या झाल्याचे दिसून आले़ दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावशिवात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात़ मात्र पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे़ हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फवारणी केली़ फेरोमन ट्रॅप, लाईट ट्रॅप लावून बोंडअळीवर नियंत्रण मिळविले़ पोळ्यापर्यंत ही स्थिती चांगली होती़ परंतु, पावसाने पाठ फिरविल्यामुळे तीन ते चार फुटापर्यंतच कापसाचे पीक मर्यादित राहिले आहे़ बोंडाची संख्या घटली आहे़

सप्टेंबर महिन्यातच आॅक्टोबर हिटचे चटके बसल्याने पात्यांची गळ झाली़ केवळ प-हाट्या शिल्लक राहिल्या आहेत़ ज्या गावातून कापसाची कोट्यवधींची उलाढाल होते तेथे आर्थिक संकट उभे टाकले आहे़ रबी हंगामात तर केवळ पाच टक्के पेरणी झाली आहे़ पुरेशा ओलाव्याअभावी पेरलेले उगवले नाही़  बोंदरगावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्मण झाला आहे. रबी हंगामात पेरणी नसल्यामुळे चाऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 

सोनपेठ तालुक्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा खेळ बिघडवला आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या़ या आशेवरच नगदी पीक म्हणून कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पाऊस रूसल्याने संपूर्ण तालुक्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोंदरगाव शिवाराला भेट दिली तेव्हा दुष्काळाचे वास्तव अधिक गंभीर असल्याचे दिसून आले़ 

कापसाचे उत्पादन घटलेकापसाचे बोंडे परिपक्व होण्याच्या काळातच पावसाचा खंड पडला़ त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला़ तालुक्यात कापसाचे उत्पादन घटले आहे़ -गणेश कोरेवाड, तालुका कृषी अधिकारी, सोनपेठ

बळीराजा काय म्हणतो?

स्थलांतर सुरू झालेपावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे़ गावात काम नसल्याने युवक कामाच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. - मदन सपकाळ

संकटांनी शेतकरी खचलासातत्याने कधी दुष्काळ, कधी लाल्या तर कधी बोंडअळी अशा संकटांनी शेतकरी खचला असून, कोणतेच पीक हाती लागत नसल्याने नैराश्य आले आहे़ - श्यामसुंदर सपकाळ

काय खायचे?अवेळी व कमी पडलेला पाऊस, खरिपाच्या उत्पादनात झालेली मोठी घट आणि पावसाअभावी रबीचे उत्पन्नही मिळणार नसल्याने आता काय करायचे? काय खायचे? असा प्रश्न पडला आहे. - गोकुळदास चतुर

खर्चही निघाला नाहीमला चार एकर शेती असून, चारही एकरात कापूस लावला होता़ पावसाअभावी एकरी दोन ते अडीच क्विंटलचा उतारा आला असून, त्यातून उत्पादन खर्चही निघाला नाही. -रमेश ढमे 

काही आकडेवारी : - बोंदरगावचे भौगोलिक क्षेत्र एकूण क्षेत्रफळ : ७२९ हेक्टर- कापूस : ४०० हेक्टरवर- सोयाबीन ३०० हेक्टर- तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती