शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:37 IST

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ 

ठळक मुद्देबोंदरगाव शिवारातील स्थिती शेतकऱ्यांवर वांझ प-हाट्या उपटण्याची आली वेळ

- सुभाष सुरवसे, सोनपेठ, जि. परभणी 

परतीच्या  पावसाने दगा दिला. त्यामुळे जेमतेम तग धरीत उगवलेल्या कपाशीला बाळसेच आले नाही. झाडे जेमतेम वाढली, पण फुले-बोंडे लागली नाही. त्यामुळे कापूस वेचणीचा हंगामच यंदा नशिबी नाही! पहिल्याच वेचणीच्या काळात प-हाट्या उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून प-हाट्याचे जळतन करावे लागत आहे़ सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ 

बोंदरगाव परिसरातील शेत शिवारांमध्ये फेरफटका मारताना कापसाची पिके चक्क वाळलेली होती़ बोंडे, पाते गळ सुरू होती़ या भागात पहिली वेचणीही हाती आली नाही़ त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापसाच्या प-हाट्या झाल्याचे दिसून आले़ दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावशिवात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात़ मात्र पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे़ हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फवारणी केली़ फेरोमन ट्रॅप, लाईट ट्रॅप लावून बोंडअळीवर नियंत्रण मिळविले़ पोळ्यापर्यंत ही स्थिती चांगली होती़ परंतु, पावसाने पाठ फिरविल्यामुळे तीन ते चार फुटापर्यंतच कापसाचे पीक मर्यादित राहिले आहे़ बोंडाची संख्या घटली आहे़

सप्टेंबर महिन्यातच आॅक्टोबर हिटचे चटके बसल्याने पात्यांची गळ झाली़ केवळ प-हाट्या शिल्लक राहिल्या आहेत़ ज्या गावातून कापसाची कोट्यवधींची उलाढाल होते तेथे आर्थिक संकट उभे टाकले आहे़ रबी हंगामात तर केवळ पाच टक्के पेरणी झाली आहे़ पुरेशा ओलाव्याअभावी पेरलेले उगवले नाही़  बोंदरगावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्मण झाला आहे. रबी हंगामात पेरणी नसल्यामुळे चाऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 

सोनपेठ तालुक्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा खेळ बिघडवला आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या़ या आशेवरच नगदी पीक म्हणून कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पाऊस रूसल्याने संपूर्ण तालुक्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोंदरगाव शिवाराला भेट दिली तेव्हा दुष्काळाचे वास्तव अधिक गंभीर असल्याचे दिसून आले़ 

कापसाचे उत्पादन घटलेकापसाचे बोंडे परिपक्व होण्याच्या काळातच पावसाचा खंड पडला़ त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला़ तालुक्यात कापसाचे उत्पादन घटले आहे़ -गणेश कोरेवाड, तालुका कृषी अधिकारी, सोनपेठ

बळीराजा काय म्हणतो?

स्थलांतर सुरू झालेपावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे़ गावात काम नसल्याने युवक कामाच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. - मदन सपकाळ

संकटांनी शेतकरी खचलासातत्याने कधी दुष्काळ, कधी लाल्या तर कधी बोंडअळी अशा संकटांनी शेतकरी खचला असून, कोणतेच पीक हाती लागत नसल्याने नैराश्य आले आहे़ - श्यामसुंदर सपकाळ

काय खायचे?अवेळी व कमी पडलेला पाऊस, खरिपाच्या उत्पादनात झालेली मोठी घट आणि पावसाअभावी रबीचे उत्पन्नही मिळणार नसल्याने आता काय करायचे? काय खायचे? असा प्रश्न पडला आहे. - गोकुळदास चतुर

खर्चही निघाला नाहीमला चार एकर शेती असून, चारही एकरात कापूस लावला होता़ पावसाअभावी एकरी दोन ते अडीच क्विंटलचा उतारा आला असून, त्यातून उत्पादन खर्चही निघाला नाही. -रमेश ढमे 

काही आकडेवारी : - बोंदरगावचे भौगोलिक क्षेत्र एकूण क्षेत्रफळ : ७२९ हेक्टर- कापूस : ४०० हेक्टरवर- सोयाबीन ३०० हेक्टर- तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती