शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

तीन जिल्ह्यातून वाहतूक होणा-या राहटी बंधा-यावरील पुलाचा धोका वाढला, वाहने जाताना पुलाला बसतात हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:36 IST

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़

ठळक मुद्देपुलावरून वाहने नेताना पुलाला हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केली नदीपात्रापासून सुमारे ३० फुट उंचावर हा पूल आहे़ या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे़

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़ पुलावरून वाहने नेताना पुलाला हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केल्याने ही बाब आणखीच गंभीर बनली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग पुढे नांदेडकडे जातो़ या रस्त्यावर राहटी गावाजवळ पूर्णा नदीच्या बंधा-यावर हा पूल उभारला आहे़ १० खांबांवर हा पूल असून, अर्धा किमी अंतराचा आहे़ मागील एक वर्षापासून पुलाची दुरवस्था झाली आहे़ सध्या या दुरवस्थेत आणखीच भर पडली असून, पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे़ विशेष म्हणजे हा पूल अरुंद आहे आणि त्यावरून दोन्ही बाजुंनी वाहतूक होते़ त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ हिंगोली, वाशीम आणि विदर्भात जाणारी वाहने याच पुलावरून धावतात़ त्याच प्रमाणे परभणीकडून वसमत, नांदेड, किनवटमार्गे आंध्रप्रदेशात जाण्यासाठीही या पुलाचाच वापर होतो़ राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो वाहने येथून धावतात़ प्रत्येक मिनिटाला ३ जड वाहने, ५ ते ७ आॅटो व इतर लहान वाहने आणि तेवढीच दुचाकी वाहने या रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले़ त्यावरून रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज बांधता येतो़ 

शेकडो वाहनांची दिवस-रात्र वाहतूक सुरू असल्याने पुलाची दुरवस्था वाढत चालली आहे़ या पुलावरील रस्त्यावर गिट्टी शिल्लक राहिली नाही़ पुलाच्या छतावरील सिमेंट जागोजागी उघडे पडले आहे़ तसेच जड वाहन पुलावरून गेल्यानंतर हादरे बसत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे़ मागील सहा महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ वाहने  हळू चालवावी लागत आहेत़ तसेच कठडे तुटल्यामुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन नदी पात्रात पडण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे या पुलाची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पार्डीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्याची भेट झाली नाही़ त्यामुळे बांधकाम विभागाची बाजू समजू शकली नाही़

सतत वाढतोय पुलाचा धोका नदीपात्रापासून सुमारे ३० फुट उंचावर हा पूल आहे़ या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे़ विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला असलेले लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून वाहतूक करताना आणखी धोका वाढला आहे़ काही ठिकाणी तर तुटलेल्या कठड्याच्या जागी बांबू लावून तात्पुरती डागडुजी केली आहे़ मात्र वाहनांच्या धडकेने हे बांबू कितपत टिकाव धरतात? असा प्रश्न निर्माण होत आहे़ 

डागडुजीसाठी कारवाईची आवश्यकताराहटी बंधा-यावरील पुलाची दुरवस्था झाल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ 

समितीनेही दिला होता अहवालमध्यंतरी जिल्ह्यातील पुलांची पाहणी करण्यासाठी मुंबई येथून एक समिती जिल्ह्यात येऊन गेली़ या समितीने राहटी पुलाबरोबरच परभणी येथील उड्डाणपुल, पाथरी तालुक्यात गोदावरी नदीवरील ढालेगावचा पूल या पुलांची पाहणी केली होती़ त्यावेळी या समितीनेही राहटीचा पूल धोकादायक असल्याची माहिती समितीतील अधिका-यांनी त्यावेळी ‘लोकमत’ला दिली होती़ त्यामुळे राहटी पुलाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ वाहनधारकही हैराण झाले आहेत.