शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

तीन जिल्ह्यातून वाहतूक होणा-या राहटी बंधा-यावरील पुलाचा धोका वाढला, वाहने जाताना पुलाला बसतात हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:36 IST

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़

ठळक मुद्देपुलावरून वाहने नेताना पुलाला हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केली नदीपात्रापासून सुमारे ३० फुट उंचावर हा पूल आहे़ या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे़

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़ पुलावरून वाहने नेताना पुलाला हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केल्याने ही बाब आणखीच गंभीर बनली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग पुढे नांदेडकडे जातो़ या रस्त्यावर राहटी गावाजवळ पूर्णा नदीच्या बंधा-यावर हा पूल उभारला आहे़ १० खांबांवर हा पूल असून, अर्धा किमी अंतराचा आहे़ मागील एक वर्षापासून पुलाची दुरवस्था झाली आहे़ सध्या या दुरवस्थेत आणखीच भर पडली असून, पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे़ विशेष म्हणजे हा पूल अरुंद आहे आणि त्यावरून दोन्ही बाजुंनी वाहतूक होते़ त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ हिंगोली, वाशीम आणि विदर्भात जाणारी वाहने याच पुलावरून धावतात़ त्याच प्रमाणे परभणीकडून वसमत, नांदेड, किनवटमार्गे आंध्रप्रदेशात जाण्यासाठीही या पुलाचाच वापर होतो़ राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो वाहने येथून धावतात़ प्रत्येक मिनिटाला ३ जड वाहने, ५ ते ७ आॅटो व इतर लहान वाहने आणि तेवढीच दुचाकी वाहने या रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले़ त्यावरून रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज बांधता येतो़ 

शेकडो वाहनांची दिवस-रात्र वाहतूक सुरू असल्याने पुलाची दुरवस्था वाढत चालली आहे़ या पुलावरील रस्त्यावर गिट्टी शिल्लक राहिली नाही़ पुलाच्या छतावरील सिमेंट जागोजागी उघडे पडले आहे़ तसेच जड वाहन पुलावरून गेल्यानंतर हादरे बसत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे़ मागील सहा महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ वाहने  हळू चालवावी लागत आहेत़ तसेच कठडे तुटल्यामुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन नदी पात्रात पडण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे या पुलाची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पार्डीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्याची भेट झाली नाही़ त्यामुळे बांधकाम विभागाची बाजू समजू शकली नाही़

सतत वाढतोय पुलाचा धोका नदीपात्रापासून सुमारे ३० फुट उंचावर हा पूल आहे़ या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे़ विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला असलेले लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून वाहतूक करताना आणखी धोका वाढला आहे़ काही ठिकाणी तर तुटलेल्या कठड्याच्या जागी बांबू लावून तात्पुरती डागडुजी केली आहे़ मात्र वाहनांच्या धडकेने हे बांबू कितपत टिकाव धरतात? असा प्रश्न निर्माण होत आहे़ 

डागडुजीसाठी कारवाईची आवश्यकताराहटी बंधा-यावरील पुलाची दुरवस्था झाल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ 

समितीनेही दिला होता अहवालमध्यंतरी जिल्ह्यातील पुलांची पाहणी करण्यासाठी मुंबई येथून एक समिती जिल्ह्यात येऊन गेली़ या समितीने राहटी पुलाबरोबरच परभणी येथील उड्डाणपुल, पाथरी तालुक्यात गोदावरी नदीवरील ढालेगावचा पूल या पुलांची पाहणी केली होती़ त्यावेळी या समितीनेही राहटीचा पूल धोकादायक असल्याची माहिती समितीतील अधिका-यांनी त्यावेळी ‘लोकमत’ला दिली होती़ त्यामुळे राहटी पुलाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ वाहनधारकही हैराण झाले आहेत.