शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST

परभणी : कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची राख आणि अस्थी नेण्यास काही नातेवाईक धजावत नसल्याने स्मशानभूमी परिसरात जमा झालेली ही ...

परभणी : कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची राख आणि अस्थी नेण्यास काही नातेवाईक धजावत नसल्याने स्मशानभूमी परिसरात जमा झालेली ही राख स्मशानजोगींनाच नदीपात्रात विसर्जित करावी लागत आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाने मृत्यूचे प्रमाण अद्याप घटले नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर काही जण भीतीपोटी तर काही जण काळजीपोटी राख आणि अस्थी नेण्यासाठी पुढे येत नसल्याचे प्रकार घडले आहेत. मागील महिन्यात सरासरी १५ ते २० जणांचे मृत्यू कोरोनाने होत होते. त्यापैकी एक ते दोन मयतांचे नातेवाईक राख नेण्यासाठी आले नसल्याचे स्मशानजोगींनी सांगितले.

परभणी शहरात जिंतूर येथील अमरधाम स्मशानभूमी, खंडोबा बाजार येथील स्मशानभूमी आणि खानापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. जिंतूर रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होतात. या ठिकाणी राख शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. तर खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीतही राख शिल्लक असून, काही दिवस ही राख ठेवून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एकंदर दोन्ही स्मशानभूमीत शिल्लक राखेचा प्रश्न आहे.

परवानगीने अस्थींचे विसर्जन

जिंतूर रोड भागातील अमरधाम स्मशानभूमीत मागील महिन्यात काही जणांच्या अस्थी आणि राख शिल्लक राहिली होती.

अशा वेळी नातेवाईकांना फोन करुन त्यांना अस्थी व राखेविषयी विचारल्यानंतर त्यांनी परवानगी दिल्यानंतर नदीपात्रात विसर्जन केले जाते.

शिल्लक राहिलेली राख व अस्थी नातेवाईकांच्या परवानगीनंतर टेम्पोने नदीपात्र परिसरात नेऊन विसर्जित करावी लागते.

जिंतूर रोड स्मशानभूमी

येथील जिंतूर रोड भागातील स्मशानभूमीस भेट दिली तेव्हा थोड्या फार प्रमाणात राख शिल्लक असल्याचे दिसून आले. मागील महिन्यात अंत्यसंस्काराचे प्रमाण अधिक होते. मात्र आता हे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राखेचा प्रश्न नसल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीला या ठिकाणी दररोज होणाऱ्या अंत्यसंस्काराच्याच अस्थी, राख शिल्लक आहे.

खंडोबा बाजार स्मशानभूमी

खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीत काही प्रमाणात राख शिल्लक आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक उशिराने येत आहेत. संचारबंदीमुळे वाहतुकीचा प्रश्न असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राख आणि अस्थी जपून ठेवाव्या लागतात. संचारबंदीमुळेच शिल्लक राखेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीतही शिल्लक राखेचा प्रश्न आहे.

खानापूर स्मशानभूमी

येथील खानापूर भागातील स्मशानभूमीला भेट दिली तेव्हा शिल्लक राखेचा प्रश्न नसल्याचे सांगण्यात आले. या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत येऊन राख व अस्थी घेऊन जातात. त्यामुळे राखेचा प्रश्न नाही.

कोरोनाच्या भीतीमुळे काही जण अस्थी व राख संकलनासाठी आले नाहीत. तसेच काहींनी कमी प्रमाणात राख नेली. सध्या मात्र अशी परिस्थिती नाही. मात्र शिल्लक राख व अस्थी नातेवाईकांशी संपर्क करुन नदीपात्रात विसर्जित करावी लागते.

- शंकर भंडारे,

खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीत काही प्रमाणात राख शिल्लक आहे. सध्या ती एका बाजूला साठवून ठेवली आहे. संचारबंदीमुळे नागरिक, नातेवाईकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिल्लक राखेचा प्रश्न आहे.

- लक्ष्मण भंडारे

खानापूर फाटा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी नातेवाईक राख व अस्थी घेऊन जातात. त्यामुळे या स्मशानभूमीत राख, अस्थी शिल्लक नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर नेहमी प्रमाणेच प्रक्रिया होत आहे.

- अंकुश जाधव