शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

उपजिल्हा रुग्णालयाचा अपघात विभाग होतोय सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

आर. एस. साळेगावकर देवगावफाटा : सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या बाबतीत दिलासादायक ठरणारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आता जिल्हा नियोजन समितीने मंजुरी ...

आर. एस. साळेगावकर

देवगावफाटा : सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या बाबतीत दिलासादायक ठरणारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आता जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या ५० लाखांच्या निधीतून ७ खोल्यांच्या सुसज्ज आपघात विभाग तयार होत आहे. हा विभाग वैद्यकीय सुविधेत भर घालणारा ठरणार आहे.

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयास सेलू शहर व तालुक्यातील २ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९३ गावांतील रुग्णसेवेचा भार आहे. येथे ५० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी ९ ऑगस्ट २०१६ रोजी पदभार घेतल्यापासून येथील भौतिक सुविधांसह सर्व विभाग अद्ययावत झाले आहेत. बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवेत तर कमालीचा कायापालट झाला आहे. गेल्या डिसेंबर या एका महिन्याची माहिती पाहिली असता या रुग्णालयात ४५ नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत तर १९ सिझेरियन प्रसूती झाल्या असून, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया १०५, गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया ३, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया २ करण्यात आल्या. आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या वर्गातील महिलांच्या प्रसूतीसाठी तर हे उपजिल्हा रुग्णालय आशादायी ठरत आहे. त्याचबरोबर दररोज ओपीडीमधून किमान ३०० रुग्णांना येथे सेवा दिली जाते. रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण अत्यल्प असणारे हे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी आधार ठरत आहे.

कोरोना महामारीत तर येथील कोविड सेंटरचा पॅटर्न जिल्हाभरात आदर्श ठरला. येथे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. केवळ अपघातातील रुग्णांना रेफर करावे लागत होते; परंतु, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येथे ४९ लाख ८६ हजार रुपयाच्या निधीतून ७ खोल्या, शौचालयासह अद्ययावत अपघात विभागास मंजुरी मिळाली असून या पघात विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू झाले आहे. सहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असे शाखा अभियंता अभिषेक बुटोले यांनी सांगितले.

जखमींना मिळणार वेळेत उपचार

सेलू - देवगावफाटा, परभणी- पाथरी या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडतात. या अपघातातील गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून रेफर केले जात होते. त्यामुळे परभणी, नांदेड, औरंगाबाद येथील रुग्णालय गाठण्यास लागणारा बराच वेळ हा रुग्णांच्या जिवावर बेतणारा होता. मात्र, आता सुसज्ज अपघात विभागा कार्यान्वित झाल्यानंतर अपघातातील रुग्णांसाठी ही सुविधा नवसंजीवनी ठरणार आहे.