शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतीच्या वादातून मारहाणप्रकरणी २२ जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 4:21 PM

पार्डी (ता. मानवत) येथे शिवाजी दौलत खराबे व त्रिंबक रामराव खराबे यांच्यात शेतीचा वाद होता.

परभणी : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी येथील न्यायालयाने २२ जणांना वेगवेगळ्या कलमांखाली दोन महिने कारावासाची शिक्षा आणि  ६३ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल सुनावला.

पार्डी (ता. मानवत) येथे शिवाजी दौलत खराबे व त्रिंबक रामराव खराबे यांच्यात शेतीचा वाद होता. यातून २ आॅक्टोबर २०११ रोजी दोन्ही गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी शिवाजी दौलत खराबे यांनी मानवत ठाण्यात तक्रार नोंदविली होती. न्यायालयात दोषारोपपत्र  दाखल झाल्यानंतर परभणी येथील चौथे सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षी, पुराव्यांती २२ आरोपींना कलम १४८ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये आणि कलम ३२४ अंतर्गत एक महिना शिक्षा आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणातील रामराव वामनराव खराबे हे मयत झाले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली.

यांना झाली शिक्षान्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये सटवा रावण सौदागर, वन्या पनेश चव्हाण, सुरेश सूर्यभान चव्हाण, जेकर्ण्या गाखेल चव्हाण, जनाबाई तानाजी गोरे, लक्ष्मीबाई सटवाजी सौदागर, राजामती किसन नितनवरे, कमलाबाई जगन चव्हाण, रेणुका जकरण्या चव्हाण, जयाबाई ऊर्फ लता पनेश चव्हाण,  जगन चव्हाण, देवीदास रामराव खराबे, संतोष शामराव खराबे, गंगाधर रामराव खराबे, भानदास रामराव खराबे, रामराव वामनराव खराबे, दिगंबर त्र्यंबक खराबे, जगन गंगाधर खराबे, किशन वामन खराबे, दत्ता किशन खराबे आणि छत्रगू भानुदास खराबे, त्र्यंबक रामराव खराबे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCourtन्यायालयjailतुरुंगPoliceपोलिस