शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

..ए वतन तेरे लिए!

By admin | Published: August 13, 2015 3:22 PM

देश स्वतंत्र झालाय, पण आपण झालोय का स्वतंत्र? आणि आपल्या आजूबाजूची माणसं? त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का काळानुरूप नव्या लढाया?

उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आपल्या कुणाहीसाठी परमोच्च आनंदाचा क्षण. राष्ट्रगीताची धून कानावर पडताच, देशभक्तीनं आपल्यातला रोम रोम जागा होतो. 
आपल्या डोळ्यात आनंदाश्रू तुंबळ गर्दी करतात.
आणि ते पाणी डोळ्याआड करत
तिरंग्याला खणखणीत सलाम ठोकताना वाटतं की,
नशीबवान आहोत म्हणून या देशात जन्माला आलो.
भाग्य आपलं म्हणून या मातीत उगवलो,
वाढलो आणि एकेक श्वास जगत फुलतोय.
मात्र.
हे सारं स्वत:शीच कबूल करताना,
भारतमातेला वंदन करताना आपण
कधी विचारतो स्वत:ला की,
आपण काय करतो या देशासाठी?
या देशाचा वारसा डोईवर घेऊन चालताना
आपण कुठली अभिमानाची नवी पायवाट चालतोय?
आणि
देश स्वतंत्र झालाय,
पण आपण झालोय का स्वतंत्र?
आणि आपल्या आजूबाजूची माणसं?
त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का
काळानुरूप नव्या लढाया?
कुठल्या?
आपल्याच जुन्या जातीपातीच्या, भेदाच्या?
घोर अंधश्रद्धांच्या ओङयाच्या?
जुन्या गैरसमजुतींच्या?
नशेच्या विळख्याच्या
आणि त्यातून येणा:या
विपन्नावस्थेच्याही?
या सा:या जाचक बेडय़ातून
आपण कसे स्वतंत्र होणार?
कधी ज्ञानाचा प्रकाश पाहणार?
कधी विचारांच्या 
आणि तर्काच्या कसोटीवर
घासूनपुसून घ्यायला शिकणार गोष्टी?
कसं?
हे सारं कसं जमावं?
कशा झुगारता येतील या जुन्या
आणि आपल्याला गुलाम बनवून ठेवणा:या,
असहाय-हतबल आणि तितकंच
परतंत्री बनवून ठेवणा:या गोष्टी?
काही दोस्त शोधताहेत त्याच वाटा,
करताहेत तसे प्रयत्न?
लढताहेत एक नव्याच
स्वातंत्र्याची लढाई.
त्यांच्याशी एक खास भेट.
उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त.
भारतमातेला सलाम करताना,
करता येईल एक वायदा की,
मनावरची, विचारांवरची
जुनाट बंधनं झुगारून आम्ही
विचारांची विवेकी वाट नक्की शोधू.
ख:या अर्थानं विचारी आणि स्वतंत्र होऊ.
प्रयत्न करायला हवा..
मनापासून!!
स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा.
जय हिंद!!
- ऑक्सिजन टीम