शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

कशाला मुली वाचवता? मरू देत त्यांना...

By admin | Updated: April 26, 2017 17:10 IST

आपल्या देशात बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम सुरु आहे.पण त्याचा खरंच काय उपयोग?

 - स्वाती सहारे

मुलगी म्हणजे काय? 
मुलगी म्हणजे जन्माला येऊन केलेलं पाप?
आता असं म्हणण्याची वेळ आलीये. 
लोक म्हणतात स्त्रीभृणहत्या थांबवा. 
तिला पोटातच मारु  नका. तिचा जीव वाचवा. 
पण कशासाठी? 
ती जर पोटातच मेली ना तर बरं होईल. 
कारण ती पोटात एकदाच मरेल. 
पण तिला या जगात आल्यावर दररोज मरावे लागेल, क्षणाक्षणाला. 
दररोजची ही होणारी घुसमट, मरमर, भीती हे सगळं अनुभवण्यापेक्षा मरणं बरं. तिला जगात आल्यावर प्रत्येक सेकंदाला आपल्या मनाविरुद्ध करावे लागेल, इच्छा-आकांक्षा काय असतात हे पूर्णपणे विसरून जावे लागेल, तिचं अस्तित्व काय आहे हे तिला पूर्णत: विसरावे लागेल, आणि तुम्ही म्हणता की तिचा जीव वाचवा. ..
 स्पर्धा कुठलीही असो, अगदी ऑलिम्पिक असो.
आज सगळ्या क्षेत्रात मुली  बाजी  मारत आहेत. 
..पण माहित नाही का कुठे ना कुठे तरी त्या स्वतः शीच  लढताहेत आणि  ती बाजी मात्र हरताहेत..
आणि जिंकली  जरी तर काय मिळतं तिला?
 छेडछाड, बलात्कार, शारीरिक आणि मानिसक त्रास , अ‍ॅसीड अटॅक?
दररोज वर्तमानपत्नात यातली एक ना एक बातमी असतेच. .
शाळेत गेल्यावर आपण शिकतो की, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.. मग काही काळाने आपण हे कसं काय विसरून जातो. .?
का हे थांबत नाही ?
याला कोण जबाबदार आहे?
आपला समाज ज्याने स्त्रियांसाठी कडक नियम बनवून ठेवले आहेत?
सातच्या आत घरात, काय कपडे घालायचे?
कोणती कामे करायची. 
काय करायचं आणि काय नाही? 
सगळी बंधने तिच्यावर लादली गेली आणि आताही लादली जात आहेत.  पण मग पुरूषांसाठी असे नियम या समाजाने का बनवले नाहीत. 
का तिला वेगळी वागणूक दिली जाते?  आपल्या देशात बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम सुरु आहे.
पण त्याचा खरंच काय उपयोग?
 बदल हवा आहे. पण तो कोण करणार?  सुरूवात स्वात:पासून करा. एकदा तरी.