शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

तरुण लव्हस्टोरीत कोण आहेत आजचे सुपरव्हिलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 07:00 IST

प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. दोन लोकांचा मामला. ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. पण काही कडवट लोक असतात, दुनियेत कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. ते तयारच असतात या फुलपाखरांना झोडपण्यासाठी.

ठळक मुद्देत्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

-श्रेणिक नरदे

प्रेम ही आंधळी गोष्ट असल्याने ती कधीही, कुणावरही होऊ शकते, प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. हा दोन लोकांचा मामला असतो. मग ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. फुलांसारखे भिडत असतात. काही चांगले लोक असतात ते निरागसपणे या फुलांकडे, फुलपाखरांकडे बघत असतात, मात्र काही कडवट लोक असतात. दुनियेत काही कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. असे काही लोक या फुलपाखरांना झोडपण्यासाठी हाताच्या बाह्या सरसावून बसलेले असतात.या अशा देखण्या प्रवृत्तीचे लोक कोण असतात ? त्यांच्या कलागुणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपलं प्रेम जुळणं. हे आधी आपल्याला कळतं आणि आपल्या आधी आपल्या दोस्त, मित्रमैत्रिणींना कळतं. कधीकधी या लोकांनीच आपल्याला खांद्यावर बसवून किंवा उचलून प्रेमात पाडलेलं असतं. म्हणजे प्रेमात माणूस पडत असतो पडत असताना हे लोक धक्का मारतात आणि पाडतात मग आपण प्रेमात पडतो. आता यांचं सगळं त्यातल्या त्यात बरं चाललेलं असताना या बिचार्‍यांना कुठून तरी कसला तर त्रास व्हायला सुरुवात होते. मग ते आरे ते सगळं खरं हाय पण तिची हिश्ट्री काढली का हिश्ट्री ? असा एवढाच प्रश्न विचारून अंडीतून बाहेर आलेला बारीक साप सोडून देतात. हा साप बारीक जरी असला तरी तो वळवळतो. आणि हा किंवा ही तिची/त्याची हिश्ट्री काढतात. मग हा पूर्ण सव्र्हे असतो. त्यांच्या घराशेजारचा दोस्त, मैत्रिणींना विचार, त्यांच्या पाहुण्यांना विचार, त्यांच्या जुन्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना विचारून कुठं काही इतिहासात एखादी ऐतिहासिक घडामोड घडलीय का याचा आढावा घेण्यासंबधी आपले जवळचे मित्रमैत्रिणी प्रेरणा देत असतात आणि यातून शंका, संशयकल्लोळ अशा टाइपचं वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आताच्या काळात प्रेम हे केवळ दोन लोकांचं कधीही नसतं. हे जर खोटं वाटत असेल तर कुठलाही शिनमा काढून बघा गाण्यात दोघं न नाचता अख्खा गाव नाचत असतो त्या प्रेमवीरांबरोबर.   घर, कॉलेज, शिक्षक, नातेवाईक याआधी आपल्या दिवटय़ा मित्रमैत्रिणींनाच हे कळलेलं असतं. तिथूनच या ष्टोर्‍या लिक होतात. आपल्याला वाटतं कुणाला काहीच माहीत नाही पण अख्ख्या दुनियेला आपली कथा माहिती झालेली असते आणि याचं सारं श्रेय आपल्या मित्रमैत्रिणींना जातं. आपण सारे लोक भारतातले बांधवबिंधव असतो. पहिली ते दहावी रोज सकाळी आपण भारतमातेची लेकरं प्रतिज्ञा घेत असतो. मग नंतरून आपल्याला जातधर्म वगैरे श्रेष्ठ असल्याची जाणीव होते. त्या श्रेष्ठ असण्यानसण्यातून आंतरजातीयधर्मीय जे लोक प्रेम करत असतात त्यांना प्रचंड त्रास होतो. त्या दोघांना आपल्या जातिधर्माविषयी काही आक्षेप नसताना दुनियेला मात्र असतो. प्रियकराच्या, प्रेयसीच्या जातीवरून दोस्त लोक टोमणे मारण्याचा सपाटा लावतात. ही गोष्ट अशी न तशी घरादारापर्यंत पोहचते. आता अलीकडे चांगले मोबाइल आल्यानं त्यात छान फोटो काढता येतात. कुठूनतरी फोटो काढून ते गावभर फिरवण्याचा अतिरेकी इंट्रेस्टही काही लोकांना असतो. ही प्रवृत्ती आणि काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका जोडप्याला मारहाण करणार्‍या लोकांची प्रवृत्ती यात काडीचाही फरक नसतो. तोड देंगे बदण का कोना कोनाजहाँ दिखेंगे बाबू शोना असा मजकूर असलेले आणि जोडप्यांना पळवून पळवून मारणारे काही व्हिडीओही व्हॅलेंटाइन सप्ताहात व्हायरल झाले. तसं अनेकांना पळवून लावलंच त्यांनी या ही व्हॅलेंटाइन्सला. ही दहशतीच्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणं आपण बघतोय. एकतर सार्‍या सार्वजनिक जागांवर लोकांचा कायमचा जागता पहारा असतो, निर्मनुष्य आणि वर्दळ नसलेली ठिकाणं कमी असतात. यासाठी बहुतांशी लोक हे बाहेर फिरायला जात असतात. तिथं काही टोळकी येतात, ते या दोघांना पकडतात, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन हे लोक कुठल्या संस्कृतीचे नेमकं रक्षण करतात हे न उलगडलेलं कोडंच. ही अशी जी जमात असते, मुळात या लोकांना कुणी हिंग लावून विचारत नसतं. त्या निराशेतून हे लोक दुसर्‍या जोडप्यांशी कितीतरी क्रुरतेनं वागत असल्याचं पाहायला मिळतं. याहून भयानक गोष्ट म्हणजे या जमातीला समाजाचाही पाठिंबा असतो. ही खरी शरमेची बाब असते. मध्यंतरी एक बातमी वाचायला मिळाली, एका उद्यानात प्रेमीयुगुल येऊन बसतात म्हणून तिथल्या बाकडय़ांवर जळकं ऑइल कुणीतरी आणून टाकलंत. आता पूर्वीच्या प्रमाणात कुठेतरी थोडाफार समंजसपणा समाजात येऊ लागला हे दिसताच अशा काही बातम्या येतात ज्यातून काळजाचा थरकाप उडतो अक्षरशर्‍. दोनचार दिवसांपूर्वी आलेली अशीच एक बातमी. एका मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या ही प्रत्यक्षदर्शनी जरी दिसत असली तरी ती अप्रत्यक्षपणे समाजाने केलेली हत्याच आहे हे नाकारून चालणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलीने पळून जाऊन लग्न करणं ही गोष्ट नक्कीच आत्महत्या करण्याइतपत मोठ्ठी नव्हती. पण समाजाने जो त्यांच्या कुटुंबीयांवर सामाजिक दबाव टाकलाय त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल मजबुरीने उचललं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सारे प्रकार बघितल्यानंतर यात त्या प्रेम या भावनेचा दोष तरी नेमका काय असा प्रश्न पडतो. इथली जातव्यवस्था, अर्थव्यवस्था, वर्णव्यवस्था यांनी आपल्या समाजाभोवती एक अदृश्य नैतिकतेचं कुंपण टाकून त्यात सर्वांना जखडून ठेवण्याचा उद्योग केला आहे. या सर्व गोष्टींना माणसाचा अडाणीपणा जबाबदार आहे. जोवर साक्षर, सुशिक्षित यांच्या पलीकडे जाऊन आपला समाज संवेदनशील होईल तेव्हाच काहीतरी भल्याचं होईल. तोवर आहेतच, प्यार के दुश्मन हजार काय लाख!त्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

( श्रेणिक प्रगतशील शेतकरी आणि लेखक आहे.)