शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काय घालायचं, हे तुम्ही कोण ठरवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 07:30 IST

मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बंड पुकारणार्‍या मुली काय म्हणतात?

ठळक मुद्दे आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 

-स्नेहा मोरे

जे. जे. महाविद्यालयात तोकडय़ा कपडय़ांवरून हंगामा झाला. मुलींनी शॉर्ट स्कर्ट घालू नयेत, मुलांशेजारी बसू नये असा आदेश निघाला. काही वेळातच तो मेसेज व्हायरल झाला, अन मग वसतिगृहात एकच खळबळ माजली. मुलींना वेळेचं- कपडय़ांचं बंधन होतंच त्यामुळे असंतोष वाढला. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील प्रख्यात जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला याचंच अनेकांना नवल वाटलं.जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आदेश दिले अन मग त्यानंतर ते काही दिवस सुटीवर होते. दरम्यान महाविद्यालयात मुलींनी आक्र मक पवित्ना धरला. त्यातल्याच एका विद्यार्थिनीने या बंडखोरीविषयी सांगितले की, अधिष्ठाता कार्यालयासमोर स्कार्फ बांधून ठिय्या सुरू केला. आमच्याच वागण्यावर बंधनंका? आम्हीच का वेळ पाळायची, असं आमचं म्हणणं. काही बदलायचचं असेल तर तुमचे विचार बदला. आता एकविसाव्या शतकात आहोत, आम्ही मॅच्युअर्ड आहोत. डॉक्टर होणार आहोत. आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नुकतीच इंटर्नशिप पूर्ण व्हायला आलेली विद्यार्थिनी सांगत होती. लायब्ररीत थांबायच्या वेळेवरही बंधनं आहेत आणि हे फक्त आमच्याच महाविद्यालयात आहे. हे असं का? आम्हाला नियमांची वेगळी फूटपट्टी का? आम्ही ठरवलं होतं, नियम पाळायचे नाहीतच. बंडखोरी करायलाच हवी. हा संघर्ष केवळ कपडय़ांपुरता मर्यादित नव्हता. ही आमच्या अस्तित्वाची लढाई होती, आज आवाज उठवला नाही तर आमच्यानंतरच्या बॅचलाही हे असले ठोकताळे लावले गेले नसते. महोत्सवाचा दिवस उजाडला, अन वर्षभर तयारी केल्याप्रमाणे आम्ही तयार झालो. थोडं दडपणं होतं मनात; पण आम्ही ठरवल्याप्रमाणे महोत्सवाच्या दिवशी ठरवलेले आमच्या आवडीचे कपडे परिधान करून गेलो. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने हटकलं खरं, पण आम्ही ऐकलं नाही. आम्ही त्या महोत्सवात सहभागी झालो, रात्नंदिवस काम करताना थकणारे आम्ही वर्षभरातून एकदाच येणारा हा दिवस आम्ही साजरा केला. महाविद्यालय प्रशासन घडल्याप्रकाराबाबत चौकशी करणार आहे. मात्न आम्ही त्याला सामोरे जायचं ठरवलं आहे.’मुली सांगतात की ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आता तूर्तास हे प्रकरण मिटलं असलं तरी मुंबईसारख्या शहरातही मुलींच्या कपडय़ांवरून अजून वादंग होत आहेत आणि त्याविरोधात मुली उघड बंड करत आहेत, हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.