शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ऑफिसवाल्यांनीच तुम्हाला स्वतः Resign करायला सांगितलं तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 4:39 PM

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे.

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे. कारण सतत आपला पर्फोमन्स द्यावा लागतो नोकरी आज आहे तर उद्या नाही  अशी परिस्थिती असते. त्यातुनच आर्थिक मंदीचा फटका संपूर्ण भारतातल्या कंपन्याना बसत असताना प्रत्येक व्यक्तीला आपला जॉब टिकवण्यासाठी आधीपेक्षा  खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अनेक जण मानसीक तणावात जगत असतात.

स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन वावरत असतात. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल  टेंन्शन घेण्यासारखं यात काहीही नाही, जर तुमच्यावर जॉबलेस होण्याची वेळ आली तर ही  परिस्थिती कशी हॅण्डल करायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(image credit-IES magazine)

अनेक मुलांवर आणि मुलींवर घरची जबाबदारी असते. त्यामुले पैसे कमावण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना  स्वतःच आयुष्य मनासारखं इन्जॉय करता येत नाही  मानसीक आरोग्य चांगले राहत नाही. कारण सतत पैश्याच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडफड चालू असते. आकड्यांचं चक्र डोक्यात फिरत असतं. 

(image credit- forbes)

अनेकदा खासगी क्षेत्रात वातावरण अनुकूल वातारणं नसतं. सहकारी वर्ग तसचं बॉसच्या नकारात्मक प्रतिक्रिया काहीवेळा त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणचे मॅनेजमेंट पोलीसी किंवा अंतर्गत काही कारणांमुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात येऊ शकतं. या स्थितीतून बाहेर पडून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ( हे पण वाचा-अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नसेल, तर 'या' खास टीप्स तुमच्यासाठीच)

(image credit-menutes.com)

कोणत्याही कंपनीत  तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ का येते

राजीनाम्यासाठी कोणतीही जबाबदारी कंपनीची राहत नाही. जरी आपण कंपनीच्या दबावात राजीनामा दिला असला तरी उद्या आपण कोणत्याही शासकीय किंवा न्यायालयीन व्यवस्थेपुढे आव्हान देऊ शकत नाही. कारण तुम्ही स्वखुशीने राजीनामा दिला आहे असेच अधोरेखित होते. (त्यामुळे अनेकदा कंपनीतील चोरी, विनयभंग, गैरव्यवहार अश्या प्रकरणात देखील थेट टर्मिनेशन चा मार्ग न अवलंबता त्या एम्प्लॉयीकडून राजीनामा लिहून घेतात. असो…) कंपनीचे कुठल्याही प्रकारचे दायित्व व जबाबदारी अशावेळी राहत नाही. अनेकदा कंपनीला होणारं नुकसान परवडणारं नसतं त्यामुळे तुम्हाला पदावरून हटवण्यात सुद्धा येऊ शकतं.( हे पण वाचा- जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा )

(Image credit-live science)

मानसीक आरोग्य  असं ठेवा चांगलं.

तुमच्याबाबतीत सुद्धा असं झालं तर  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा.

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्या व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यPersonalityव्यक्तिमत्व