शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शट

By admin | Updated: June 19, 2014 21:38 IST

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र

 डॉ. मनोजकुमार शर्मा

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या 
हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर 
करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र
----------
ड्रग किंवा दारूची नशा करणार्‍या माणसांचं जे होतं, जसं होतं तेच सेलफोनच्या, इंटरनेटच्या आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या सतत, अती आणि दीर्घकाळ वापरामुळं ‘वापरणार्‍यांचं’ होतं का?
-तर होतं, हे सगळं ‘अँडिक्टिव्ह’च असतं, असा आजवरचा जगभरातला अभ्यास सांगतो. अवतीभोवतीचे अनेक तरुण आणि किशोरवयीन मुलं अस्वस्थ होत, चुळबुळत सतत आपला मोबाइल कसा चेक करतात हे जरी नीट पाहिलं तरी हे अँडिक्शन लक्षात येईल. ते सतत फोन चेक करतात, सतत फोनवर नवीन मेसेज आलाय की नाही चेक करतात, आला नसेल तर जुनाच मेसेज पुन्हा पुन्हा वाचतात, सोशल नेटवर्किंग साईटवरचे स्वत:चेच फोटो पुन्हा पुन्हा बघतात. सतत स्वत:चेच सेल्फी काढतात, टाकतात. पुन्हा त्यावरच्या कमेण्ट एन्जॉय करत, तिथे कमेण्टस् करत राहतात.
हे चक्र सुरूच राहतं आणि मग ही मुलं निद्रानाश, डिप्रेशन आणि एकटेपणासारख्या व्याधींना बळी पडतात. ते टाळायचं म्हणून पुन्हा आपापल्या व्यसनाचा आधार घेतात. आतून इतके पोकळ, भुसभुशीत बनत जातात की त्यांना स्वत:ला कण्ट्रोल करणं अवघड होऊन बसतं.
अशी मुलं सतत एकच तक्रार करतात, मला ‘बोअर होतंय’, काही जण अटेन्शन सिकिंग करतात, लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून मुद्दाम चुकीचंसुद्धा वागतात. फेसबुकवरच्या तमाम फोटोत ते हसरे दिसतात, पार्टी करत असतात, एकदम हॅपनिंग असतं त्यांचं जग पण प्रत्यक्षात मात्र ते उदास-एकेकटेच असतात. त्यांचे पालक मुलाच्या वर्तनाविषयी सतत काळजी करतात, पण घरात मुलांशी एकतर ते बोलू शकत नाही किंवा बोललं तरी मुलं त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाहीत.
हे असं सारं का घडतंय यावर आम्ही संशोधन करत होतो. मुळात कुठलीही टेक्नॉलॉजीच घातक ती बंद करायला हवी हा विचार चुकीचा. टेक्नॉलॉजीचा उत्तम-योग्य आणि कण्ट्रोल्ड वापर आयुष्य सोपं करू शकते. पण तसं झालं नाही की गोष्ट बिघडायला लागतात.
सुरुवातीच्या काळात आमच्याकडे मानसिक समस्या घेऊन येणार्‍या तरुण रुग्णांना आम्ही विचारायचो की इंटरनेट वापरतोस का? किती वापरतो? साधारण २५ टक्के रुग्णांमध्ये एक गोष्ट सारखी होती, एकतर त्यांना आधीपासून मानसिक तणाव होता. इंटरनेटच्या अतीव वापरानं तो वाढला.
मग आम्ही हेही शोधायला लागलो की इंटरनेटच्या अती वापरानं मानसिक तणाव वाढला की मानसिक तणाव होताच म्हणून इंटरनेटचा वापर वाढला.
मग लक्षात यायला लागलं की, जी माणसं इंटरनेट दीर्घकाळ किंवा जास्त वापरतात ते मुख्यत: एकेकटे किंवा एकलकोंडे असतात. त्यांना आपल्या एकटेपणाचा खूप त्रास होतो म्हणून मग ‘माणसं’-गप्पा आणि आधार शोधत ते या आभासी जगात येतात.
१३ ते १८ या वयोगटातल्या मुलांमध्ये तर हा प्रश्न जरा जास्त गंभीर दिसतो. व्हिडीओ गेम आणि फेसबुक यासाठी होणारं या मुलांचं क्रेव्हिंग जबरदस्त होतं. तर १८ ते २५ या वयोगटातही एकेकटे, अबोल असणारे, कुढे असे सारे तरुण इंटरनेटचा हात चटकन पकडताना दिसतात. त्यांच्यासाठी मात्र सोशल नेटवर्किंगबरोबरच पोर्नोग्राफिक साईट्स, तसले व्हीडीओ आणि त्याचं शेअरिंग हे सारं फार एक्सायटिंग असतं. ती एक्साईटमेण्टच त्यांना या व्यसनाची जास्त चटक लावते. आमच्या शहरात आम्ही घरोघर जात मुलांशी या विषयावर बोललो आणि आमच्या लक्षात आलं की मानसिक तणाव, आत्मविश्‍वास कमी आणि इंटरनेटचा अतीवापर यांचा परस्पर संबंध आहेच.
त्यातून या मुलांचा स्वत:वरचा कण्ट्रोल सुटतो. त्यांना इतकं जबरदस्त इंटरनेटचं जबरदस्त क्रेव्हिंग होतं की, त्याक्षणी ते मिळालं नाही तर ते हिंसक होऊ शकतात. आरडाओरडा करतात, चिडतात, अस्वस्थ होतात आणि स्वत:वरचा ताबा सुटत त्यांना भयंकर त्रास होतो.
त्याक्षणी नेट मिळणं, सोशल नेटवर्किंग साईटवर जाणं, चॅट करणं, मेल पाहणं ही त्यांची गरज उरत नाही तर ते त्यांच्यावर कम्पलशनच होतं.
स्वत:साठीच कम्पलसरी होणारी ही गोष्ट त्यांना काचायला लागते. पण तो फंदा गळ्यातून सुटत नाही, सोडवता येत नाही. त्यामुळे चिडचिडी झालेली, अनेकांना भयंकर राग येतो, आईवडिलांशी शत्रू असल्यासारखी वागणारी, मित्रांपासून स्वत:ला तोडणारी अनेक मुलं आम्हाला मग भेटत राहतात. 
मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? त्यासाठीच आम्ही निम्हांसमध्ये एक ‘शट’ क्लिनिक सुरू केलं आहे. 
‘शट’ म्हणजे सर्व्हिस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजी.
टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत योग्य वापर करायला हवा. हेच आम्ही इतरांना सांगतो, त्यासाठीचे मार्ग सुचवतो. काही जणांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी अन्य औषधोपचार करावे लागतात. पण व्यायाम, आपल्या आवडीचं काम, संगीत ऐकणं, प्रवास हे सारं मदतीला घेत एक उत्तम लाईफस्टाईल चेंज यापलीकडे या प्रश्नावर इलाज नाही.
- खरंतर हा आजार असा आहे की, आपल्याला आजार आहे, तो आपणच बरा करायला पाहिजे हे अनेकांना समजतं, पण त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. 
ती इच्छाशक्ती वाढवली तरी हे इंटरनेट अँडिक्शन, हे सततच व्यसन आणि ही सततची अस्वस्थता. सारंच संपू शकेल, सुटू शकेल.!
 
(लेखक हे डिपार्टमेण्ट ऑफ क्लिनिकल सायकॉलॉजी,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स येथे  असोसिएट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.)