शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

ती एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 7:54 AM

समर आणि इशाना. दोघं प्रेमात असतात. वेगळे होतात. एक दिवस सहज भेटतात. तेव्हा..

‘ती एक भेट’ ही फक्त साडेआठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. पण, ही शॉर्ट फिल्म दोघांच्या दोन वर्षांपूर्वीच्या आणि दोन वर्षांनंतरच्या आयुष्याबद्दल बोलते. दोघांच्या नात्याबद्दल सांगते. नात्यापलीकडचंही खूप काही सांगून जाते. ही गोष्ट आहे समर आणि इशानाची. त्यांच्या एकत्र असण्याची, वेगळे होण्याची आणि तरीही आनंदी असण्याची. ही गोष्ट फक्त मौज-मजेची, रोमॅण्टिक नाही. आणि रडक्या, उद्ध्वस्त ब्रेकअपचीही नाही. ही गोष्ट आहे ब्रेकअपनंतरच्या एका छोट्याशा भेटीची. आणि ब्रेकअपसारख्या आयुष्यातल्या वेदनादायी घटनेकडे प्रॅक्टिकली पाहण्याची.समर आणि इशाना हे दोन वर्षांपूर्वी प्रेमात होते; पण ते एका टप्प्यावर वेगळे होतात. मात्र त्यांच्या वेगळे होण्यात कटुता नसते. एकमेकांना दुखवून, फसवून, दूषणं देऊन ती एकमेकांपासून वेगळी होत नाही. अतिशय समजून-उमजून, नात्यातल्या एकमेकांच्या स्पेसचा, निर्णयाचा आदर राखून वेगळी होतात. एकमेकांना विसरून जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण क्षणाक्षणाला आठवण काढून देवदासही होत नाहीत. आयुष्यात नात्यातल्या, नात्याबाहेरच्या, ओळखीच्या लोकांची जशी आपल्याला अधून-मधून हलकी, फुलकी आठवण येते, तशा या दोघांना एकमेकांच्या आठवणी येतात.त्या दिवशी इशानाला समरची आठवण येते. ज्या शहरात दोघांनी एकत्र अनेक वर्षं घालवली त्या शहरात इशाना आपल्या लिखाणाच्या कामासंदर्भात आलेली असते. तिथे आल्यावर तिला न राहवून समरची आठवण येते. करू का नको असं न करता ती त्याला फोन करते. आहे का वेळ, भेटायचं का? असा सहज प्रश्नही विचारते. व्यवसायाच्या कामात बुडालेल्या समरला तर आधी इशानाचा आवाजही ओळखू येत नाही; पण काही क्षणांत तो ओळखतो. भेटीसाठी तयारही होतो. तो तयार होत असताना त्याच्या मनात इशानाच्या आठवणी येत असतात. या आठवणींमुळेच समर आणि इशानाच्या नात्याची प्रेक्षकांना कल्पना येते. एकमेकांच्या इतक्या जवळ असतानाही ते वेगळे झाल्याची एक बाजू प्रेक्षकांना समरच्या नजरेतून समजते.समर आणि इशाना दोन वर्षांनंतर एकमेकांना भेटतात. पूर्वीचे प्रेमी म्हणून नाही, तर दोन अति ओळखीची माणसं भेटल्याप्रमाणे ती दोघं भेटतात. सुरुवातीला दोघं अडखळतात, अवघडतात. पण, नंतर सहज एकमेकांची, एकमेकांच्या कामाची, घरातल्यांची चौकशी करतात. काही मीनिटांमध्ये दोघांची भेट संपते.समरला भेटून इशाना रिक्षानं परतते तेव्हा तिच्या मनातल्या विचारांनी प्रेक्षकांना दोघांच्या वेगळं होण्याचं कारण इशानाच्या नजरेतून समजत जातं. समर आणि इशाना दोघेही समजूतदार. एकमेकांच्या प्रेमात. पण, या प्रेमापलीकडेही दोघांचं स्वतंत्र आयुष्य असलेली. दोघांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करायचं असतं, आयुष्य रेखायचं असतं. यात दोघांचं प्रेम, नातं अ‍ॅडजस्ट होणार नसतं. मग दोघेही वेगळे होतात.आता इशानाला समरला पुन्हा भेटण्याचा पश्चाताप होत नाही. उलट या एका भेटीतूनच इशानाला हे तीव्रपणे जाणवतं की माणसं वेगळी होतात, नाती संपतात; पण मनात त्यांचं असलेलं विशिष्ट स्थान कधीही संपत नाही.मनाली तेंडुलकर या फिल्मची लेखक, दिग्दर्शक. डिझायनिंगचं शिक्षण घेत असताना फिल्म मेकिंग हा तिचा स्पेशल सब्जेक्ट होता. नात्यांवर, नात्यांचं आपल्या आयुष्यात असलेल्या स्थानावर मनाली खूप गंभीरपणे विचार करायची. अभ्यासाचा भाग म्हणून तिला शॉर्ट फिल्म बनवायची होती, तेव्हा तिनं तिच्या नात्यांबद्दलचे विचार मांडायचं ठरवलं. त्यातूनच ही समर आणि इशानाची गोष्ट निर्माण झाली.‘ती एक भेट’.ही फिल्म इथं पाहता येईल..https://www.youtube.com/watch?v=c6V6w1b9P78माधुरी पेठकरmadhuripethkar29@gmail.com