शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेगाव ते अमरावती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:03 IST

या छोट्या प्रवासानं मला शहर दाखवलं, स्मार्ट जगणं दाखवलं आणि आत्मविश्वासही दिला..

- चैताली महेंद्र आसोलकार,  शेगाव

शेगाव. संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यानं पावन झालेलं बुलडाणा जिल्ह्यातलं एक गाव. माझं माध्यमिक शिक्षण इथंच झालं. दहावी पास झाले; पण माझं ठरेचना की पुढं काय? एवढं नक्की माहिती होतं की इंजिनिअरिंग नाहीच करायचं, मग बीसीए या नवीन कोर्सबद्दल माहिती मिळत गेली, अकोला कॉलेजचा विचार झाला. आणि लांब जातेच आहे तर मग अमरावतीलाच का नको म्हणून अमरावतीच्या चांगल्या कॉलेजला बीसीएला अ‍ॅडमिशन झाली.पहिल्यांदा रेल्वेने अमरावती गाठलं. अडीच तासाचा प्रवाससुद्धा इतका लांबचा वाटला होता तेव्हा ! नंतर हळूहळू सवय होत गेली त्या प्रवासाची. रेल्वे मधल्या लेडिज बोगीमध्ये बायकांची गर्दी. मुंबईवरून गाठोडे भरून माल आणायच्या काहीजणी विक्रीसाठी. तेव्हा जाणवलं की या रेल्वेसारखंच आयुष्य पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या अनेकजणी झगडत आहेत. नंतरचे तीन वर्ष प्रत्येक वेळी शेगाव - अमरावती रेल्वे प्रवास काही ना काही शिकवूनच गेला.हॉस्टेल लाइफ छान असतं हे माहिती होतं; पण अनुभव घेतला तेव्हा कळलं काय मजा आहे होस्टेलची. खूप अभ्यास, मोठं कॉलेज याबरोबरच आणखी एक भन्नाट गोष्ट होती, ती म्हणजे - माझ्या रूम पार्टनर ! शाळेतली एका बाकावरच्या मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली या मैत्रीनं. आमची मैत्री घट्ट होत गेली. गावाकडे कधीही न पाहिलेले मोठाले मॉल फिरणं, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघणं या सगळ्या नवीन गोष्टींबरोबर कॉलेजमध्ये पण नवीन नवीन अनुभव येत गेले.स्वावलंबन काय असतं हे तिथं राहून कळलं. स्वत:ची सगळी कामं स्वत: करणं, घरून सोबत आणलेलं पैशांचं बजेट सांभाळलं जावं म्हणून आॅटोऐवजी सिटी बस निवडणं असं बरंच काही व्यवहार म्हणून याच काळात शिकले. चुकत माकत, बरेवाईट अनुभव घेत मी माणसं ओळखायला शिकले. सगळीच भेटणारी हितचिंतक नसतात आणि विश्वास ठेवू नये असंही कुणी नसतं, यातला फरक समजायला लागला. बीसीएनंतर एम.एस्सीपण अमरावती विद्यापीठातूनच केलं.शहरात राहणारे स्मार्ट लोक, आपल्या साध्या राहणीमानाला ‘अडाणी’ गृहीत धरून चालतात असे अनुभव आले. पण सगळ्यावर मात करत प्रत्येकजण आपली आपली वाट शोधतोच. मीही शोधली. या शहरानं मला आत्मविश्वास दिला. माझा अमरावतीचा प्रवास खूप सुंदर होता. त्यानं जगणंच शिकवलं.मुंबईकर झालो..- हरगोविंद मुक्कावारमुंबई. मायावी शहर, गगनचुंबी इमारती. धावतं जीवन. जो तो धडपडतोय स्वप्नांचा पाठलाग करत. अशा या शहरात मी जवळपास १९८७-८८ साली दाखल झालो अन् सोडलं माझं गाव, धर्माबाद. नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्याचं ठिकाण.एक सतरंजी आणि ३०० रुपये (जे की त्याकाळी खूप वाटायचे) घेऊन मी मुंबईच्या रस्त्यावर नुसता फिरत होतो... धावत्या गाड्या. मोठ्या इमारती. आलिशान बंगले हे सगळंच पाहून मी भारावलो होतो. आणि हे सगळं आपल्याकडेपण असावं असं वाटू लागलं. मग काय मिळेल तसं काम करायचं. रस्त्यावरचं खायचं. फुटपाथवर झोपायचो आणि भावी आयुष्याचे शहरी स्वप्न रंगवायचो. अगदी नुसता वडा-पाव खाऊन दिवस मी रस्त्यावर काढत होतो, आणि थोडे थोडे पैसे जमा करायचो.मुंबईच्या बाजारपेठेत कापड, चादरी विकल्या. बºयाच कंपनीत मिळेल ते काम करत गेलो. त्यातून शिकत, वाढत जाऊ लागलो. दिवसेंदिवस. सगळ्या प्रकारचा अनुभव माझ्याकडे आला होता. तो मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर वापरत गेलो.या सर्व प्रवासात वाईट माणसांबरोबर चांगल्या व्यक्तीही भेटल्या. मी माझा संपर्क क्षेत्र वाढवत गेलो. वाट्याला आलेले अनुभव जगवतात तर वाईट अनुभव जगवायला शिकवतात. या प्रवासात माझ्या पत्नीनेही साथ दिली. तिने खासगी क्लासेसमध्ये मेहनतीनं नाव कमावलं आहे. या सर्व गोष्टींनी मला मुंबईकर बनवलं. आज मी इथलाच नागरिक म्हणून वास्तव्याला आहे.अनेक नामांकित कंपनीत मी काम केलं. जी.एम.पदापर्यंत मी पोचलो. एवढेच नव्हे तर मार्केटिंग क्षेत्रात चीनपर्यंत मला मजल मारायला जमलंय. मोतीराम गंजेवार माझ्या गावचेच. मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांनी चांगली साथ दिली. मार्गदर्शन केलं. आज मी जो काही बनलेला आहे ते फक्त त्याच्यामुळेच. सध्या मी नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरू केलाय. या मुंबईने बºयाच लोकांची स्वप्न पूर्ण केली. कष्ट करण्याची तयारी अर्थात हवीच.ती असली तर मुंबई जगवते..- डोबिंवली (मूळगाव धर्माबाद, जि.नांदेड)