शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव ते अमरावती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:03 IST

या छोट्या प्रवासानं मला शहर दाखवलं, स्मार्ट जगणं दाखवलं आणि आत्मविश्वासही दिला..

- चैताली महेंद्र आसोलकार,  शेगाव

शेगाव. संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यानं पावन झालेलं बुलडाणा जिल्ह्यातलं एक गाव. माझं माध्यमिक शिक्षण इथंच झालं. दहावी पास झाले; पण माझं ठरेचना की पुढं काय? एवढं नक्की माहिती होतं की इंजिनिअरिंग नाहीच करायचं, मग बीसीए या नवीन कोर्सबद्दल माहिती मिळत गेली, अकोला कॉलेजचा विचार झाला. आणि लांब जातेच आहे तर मग अमरावतीलाच का नको म्हणून अमरावतीच्या चांगल्या कॉलेजला बीसीएला अ‍ॅडमिशन झाली.पहिल्यांदा रेल्वेने अमरावती गाठलं. अडीच तासाचा प्रवाससुद्धा इतका लांबचा वाटला होता तेव्हा ! नंतर हळूहळू सवय होत गेली त्या प्रवासाची. रेल्वे मधल्या लेडिज बोगीमध्ये बायकांची गर्दी. मुंबईवरून गाठोडे भरून माल आणायच्या काहीजणी विक्रीसाठी. तेव्हा जाणवलं की या रेल्वेसारखंच आयुष्य पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या अनेकजणी झगडत आहेत. नंतरचे तीन वर्ष प्रत्येक वेळी शेगाव - अमरावती रेल्वे प्रवास काही ना काही शिकवूनच गेला.हॉस्टेल लाइफ छान असतं हे माहिती होतं; पण अनुभव घेतला तेव्हा कळलं काय मजा आहे होस्टेलची. खूप अभ्यास, मोठं कॉलेज याबरोबरच आणखी एक भन्नाट गोष्ट होती, ती म्हणजे - माझ्या रूम पार्टनर ! शाळेतली एका बाकावरच्या मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली या मैत्रीनं. आमची मैत्री घट्ट होत गेली. गावाकडे कधीही न पाहिलेले मोठाले मॉल फिरणं, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघणं या सगळ्या नवीन गोष्टींबरोबर कॉलेजमध्ये पण नवीन नवीन अनुभव येत गेले.स्वावलंबन काय असतं हे तिथं राहून कळलं. स्वत:ची सगळी कामं स्वत: करणं, घरून सोबत आणलेलं पैशांचं बजेट सांभाळलं जावं म्हणून आॅटोऐवजी सिटी बस निवडणं असं बरंच काही व्यवहार म्हणून याच काळात शिकले. चुकत माकत, बरेवाईट अनुभव घेत मी माणसं ओळखायला शिकले. सगळीच भेटणारी हितचिंतक नसतात आणि विश्वास ठेवू नये असंही कुणी नसतं, यातला फरक समजायला लागला. बीसीएनंतर एम.एस्सीपण अमरावती विद्यापीठातूनच केलं.शहरात राहणारे स्मार्ट लोक, आपल्या साध्या राहणीमानाला ‘अडाणी’ गृहीत धरून चालतात असे अनुभव आले. पण सगळ्यावर मात करत प्रत्येकजण आपली आपली वाट शोधतोच. मीही शोधली. या शहरानं मला आत्मविश्वास दिला. माझा अमरावतीचा प्रवास खूप सुंदर होता. त्यानं जगणंच शिकवलं.मुंबईकर झालो..- हरगोविंद मुक्कावारमुंबई. मायावी शहर, गगनचुंबी इमारती. धावतं जीवन. जो तो धडपडतोय स्वप्नांचा पाठलाग करत. अशा या शहरात मी जवळपास १९८७-८८ साली दाखल झालो अन् सोडलं माझं गाव, धर्माबाद. नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्याचं ठिकाण.एक सतरंजी आणि ३०० रुपये (जे की त्याकाळी खूप वाटायचे) घेऊन मी मुंबईच्या रस्त्यावर नुसता फिरत होतो... धावत्या गाड्या. मोठ्या इमारती. आलिशान बंगले हे सगळंच पाहून मी भारावलो होतो. आणि हे सगळं आपल्याकडेपण असावं असं वाटू लागलं. मग काय मिळेल तसं काम करायचं. रस्त्यावरचं खायचं. फुटपाथवर झोपायचो आणि भावी आयुष्याचे शहरी स्वप्न रंगवायचो. अगदी नुसता वडा-पाव खाऊन दिवस मी रस्त्यावर काढत होतो, आणि थोडे थोडे पैसे जमा करायचो.मुंबईच्या बाजारपेठेत कापड, चादरी विकल्या. बºयाच कंपनीत मिळेल ते काम करत गेलो. त्यातून शिकत, वाढत जाऊ लागलो. दिवसेंदिवस. सगळ्या प्रकारचा अनुभव माझ्याकडे आला होता. तो मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर वापरत गेलो.या सर्व प्रवासात वाईट माणसांबरोबर चांगल्या व्यक्तीही भेटल्या. मी माझा संपर्क क्षेत्र वाढवत गेलो. वाट्याला आलेले अनुभव जगवतात तर वाईट अनुभव जगवायला शिकवतात. या प्रवासात माझ्या पत्नीनेही साथ दिली. तिने खासगी क्लासेसमध्ये मेहनतीनं नाव कमावलं आहे. या सर्व गोष्टींनी मला मुंबईकर बनवलं. आज मी इथलाच नागरिक म्हणून वास्तव्याला आहे.अनेक नामांकित कंपनीत मी काम केलं. जी.एम.पदापर्यंत मी पोचलो. एवढेच नव्हे तर मार्केटिंग क्षेत्रात चीनपर्यंत मला मजल मारायला जमलंय. मोतीराम गंजेवार माझ्या गावचेच. मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांनी चांगली साथ दिली. मार्गदर्शन केलं. आज मी जो काही बनलेला आहे ते फक्त त्याच्यामुळेच. सध्या मी नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरू केलाय. या मुंबईने बºयाच लोकांची स्वप्न पूर्ण केली. कष्ट करण्याची तयारी अर्थात हवीच.ती असली तर मुंबई जगवते..- डोबिंवली (मूळगाव धर्माबाद, जि.नांदेड)