शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वेळासच्या वाळूत कासवांची शर्यत

By admin | Updated: April 26, 2017 16:58 IST

लहानपणीची ससा कासवाची गोष्ट आठवली आणि हसू आलं कारण गोष्टी प्रमाणेच इथेही कासव जिंकलं होतं!

- स्नेहा ताम्हणकर
 परीक्षा संपल्या. मार्च एण्ड संपून तेही जरा रिलॅक्स झालेत. मे महिना जवळ येऊन ठेपलाय आणि घराघरात प्लॅन्स सुरु  झाले सुट्टीत बाहेर जायचे. 
आमच्याही घरात पार स्वित्झर्लंड, मलेशिया पासून काश्मीर कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या डेस्टिनेशन्स वर चर्चा करून झाली. बाहेर फिरायला जायचं म्हटलं की पैसे तर लागणारच पण जर फिरण्याबरोबरच काही नवीन इंटरेस्टिंग, बोअर न होता शिकायला मिळालं तर खर्च केलेले पैसे पण सार्थकी लागल्याचं समाधान असतं. 
मग ठरलं कोकणात वेळासला जायचं. तिथे दरवर्षी एप्रिल मे मध्ये कासव महोत्सव असतो. जोडून आलेल्या सुट्ट्यांचं औचित्य साधून आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने. वेळास हे अगदी छोटंसं गाव आहे. तिथं राहण्यासाठी हॉटेल्स नाहीत. पण या कासव महोत्सावाच्या निमित्ताने इथले स्थानिक आपापल्या घरात पर्यटकांची राहण्याची सोय करतात. त्यातून त्यांनाही उत्पन्न मिळतं. पण या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे कासवांचं संवर्धन. 
पुण्यामुंबई पासून इथे पोहोचायला साधारण 6 तास लागतात. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही बीच वर निघालो. एका ठराविक ठिकाणापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथेच आपल्या कानांना समुद्राचे सूर ऐकू येऊ लागलेले असतात. त्या ओढीने नंतर पूर्ण पायवाटेचा प्रवास करून सुरुच्या बनातून आपण येऊन पोहचतो अफाट समुद्र किनार्‍यावर! तिथे आल्यावर काही भाग जाळी लावून बंद केल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्यांना त्याभोवती थांबण्याचे आदेश दिले जातात. 
मग एक स्वयंसेवक माहिती आणि सूचना देऊ लागतो. त्यानं काही नियम सांगितले. त्यांचं सगळ्यांनी व्यविस्थत पालन केले. मग तो माहिती देऊ लागला. ही  कासवं ऑलिव्ह रिडले नावानं ओळखली जातात. साधारण ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये मादा समुद्र किनार्‍यावर येऊन रात्नीच्या वेळेस वाळूत खोलवर अंडी घालते. जवळपास 80 ते 120 अंडी ती एकावेळेस घालू शकते. पण बरेचदा ही अंडी कुत्ने, लांडगे आणि काहीवेळेस माणसं पळवून नेतात. पण 2002 पासून सह्याद्री निसर्ग मित्न ही संस्था आणि वेळास मधील नागरिक यांच्यामुळे हे चित्न आता बदललं आहे. 
मादी अंडी घालून गेली की  त्याठिकाणी एक मोठं वर्तुळ तयार होतं. त्यावरून लक्षात येतं कि इथं अंडी आहेत. मग स्वयंसेवक ही सगळी अंडी या जाळी लावलेल्या ठिकाणी आणून वाळूत काही फूट खोल ठेऊन देतात. जाळी असल्यानं कुत्नी, लांडगे आत जाऊ शकत नाहीत. शिवाय किनार्‍यावर स्वयंसेवक गस्त घालत असल्यानं चोरही ही अंडी पळवू शकत नाहीत. तिथे प्रत्येक टोपलीखाली असणार्‍या अंड्यांची संख्या, दिवस आणि वेळ अशी सगळी माहिती लिहिलेली असते. 
हे सागरी कासव संवर्धनाचं काम आता वेळास बरोबरच आंजर्ले, हरिहरेश्वर, केळशी, दिवेआगर इथंही होऊ लागलं आहे. कासवाचं सागरी पर्यावरणात महत्वाचं योगदान आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम कासवं करतात. आत्तापर्यंत सुमारे 51000 पिल्लांना पाण्यात सोडण्यात यांना यश आलं आहे. ही सगळी माहिती सगळे जण शांतपणे ऐकत होते. माहिती देऊन झाल्यावर एका स्वयंसेवकाने आता आपण एक-एक टोपली उघडून पाहू आपल्याला आज किती पिल्लं दिसतात ते. त्याने पहिली टोपली उघडली काही नाही. दुसरी उघडली त्यातही काही नाही. अर्र्र्र गर्दीचा आवाज आला. तिसरी आणि  शेवटची टोपली उचलली आणि  6-7 पिल्लं वाळूतून बाहेर येऊ लागली. वेळासच्या मातीत नव्या जीवनाची सुरु वात झाली होती. पिल्लांना समुद्राचा आवाज ऐकू येत होता आणि त्यांची धडपड चालू झाली समुद्रात जायची. 
 
 
स्वयंसेकांनी अगदी हळुवार त्या सगळ्या  पिल्लांना एका टोपलीत ठेवलं आणि समुद्रापासून 5-6 फूट लांब वाळूत सोडलं. समुद्रात जायच्या एकच उद्देशाने प्रत्येक पिल्लू झपाझप झपाझप चालत होतं. हे सगळं दृश्य इतकं भारावून टाकणारं होतं. जेव्हा पहिलं  पिल्लू समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन त्याच्या नव्या विश्वात गेलं तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. 
उगवत्या सूर्याबरोबर  6  नवीन आयुष्यांची सुरु वात होत होती. एक-एक करत सहाही पिल्लं समुद्रात दिसेनाशी झाली. तरीही सगळ्यांचे डोळे समुद्रात शोध घेत होते अजूनही त्यांची काही झलक पाहायला मिळते का ते बघण्यासाठी. इतक्यात मी ज्याच्याकडे राहत होते त्या छोट्या ओंकारने मला पाठीमागून हाक मारली. ताई चल पक्षी बघायला जायचंय ना? मी भानावर आले आणि सुरु च्या बनातं पक्षांच्या शोधात निघाले .
लहानपणीची ससा कासवाची गोष्ट आठवली आणि  हसू आलं कारण गोष्टी प्रमाणेच इथेही कासव जिंकलं होतं!