शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

बराक ओबामा सांगतात कोरोनाकाळात जगण्याची 3 सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 15:38 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सांगतात. यांनी तरुण मुलांशी ऑनलाइन संवाद साधला.

ठळक मुद्देते सल्ले बघा, तुम्हालाही उपयोगी पडतात का?

गौरी पटवर्धन

यंदा शेवटच्या वर्षाच्या परीक्षा कधी होणार, रिझल्ट कधी लागणार याविषयी लास्ट इयरवाल्यांना काळजी वाटत असणं साहजिक आहे.मात्र कोरोना महामारी हीच एक अभूतपूर्व गोष्ट असल्यानं सारं जगच या अनिश्चिततेच्या भोव:यात आहे.मात्र  डिग्री मिळणं हा बहुतेक तरुण मुलांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. आपण ग्रॅज्युएट झालो, एक टप्पा संपला याचा तो आनंद असतो.डिग्री मिळाल्यानंतर नोकरी मिळणार असते. त्या नोकरीवर त्यांची खूप स्वप्न अवलंबून असतात. एकतर आपण स्वावलंबी, आत्मनिर्भर होणार यापुढे याचा आनंद असतो.दुसरीकडे अनेकांना वाटतं की, आता शेतात कष्ट करणा:या वडिलांना आराम देऊ, दिवसरात्न काम करणा:या आईला सुखात ठेवू. धाकटय़ा भावंडांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करायची असते. बहिणीसाठी चांगलं स्थळ आलं, तर तिचं लग्न करण्यासाठी आपलाही हातभार लागावा अशी इच्छा असते. आयुष्यभर भाडय़ाच्या घरात किंवा वस्तीत राहिलेल्या कोणाला स्वत:च्या मालकीचं घर घ्यायचं असतं, तर कोणाला टू व्हिलर किंवा फोर व्हिलर घ्यायची असते. गहाण टाकलेलं शेत सोडवून घ्यायचं असतं. त्या एका डिग्रीच्या कागदाच्या जिवावर स्वप्नांची इंद्रधनुष्य रंगवलेली असतात. काहींना अजून शिक्षणाचा पुढचा छोटा दोन वर्षाचा टप्पा दिसतो, मग लगेच मोठी भरारी असंही वाटतं.ही सारी स्वप्नं असतात. वास्तवात कुणीकुणी म्हणतंही की, नुसत्या डिग्रीचा काही उपयोग नाही.पण आपली पहिली डिग्री ही स्वप्नं पहायला मदत करतेच. आणि या मुलांनी ती स्वप्नं का बघू नयेत?इथवर येण्याचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. अनेक जणांनी अनेक अडचणींना तोंड दिलेलं असतं. फी भरायला पैशांची जमवाजमव केलेली असते. मुलींना घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी कैक वेळा दिव्य करावी लागलेली असतात.  गावाकडून शहरात येऊन राहणारे मुलगे कशा परिस्थितीत राहत असतात ते त्यांचं त्यांना माहिती असतं.  डबा शेअर करून, पार्ट टाइम नोकरी करून, जुन्या पुस्तकांवर अभ्यास करून, सुट्टीत घरी गेल्यावर शेतात राबून, पैसे उभे करून ते इथवर पोचलेले असतात.  गावातून असणा:या एकाच एसटीला लटकून नको नको ते स्पर्श सहन करत कॉलेजर्पयत प्रवास केलेला असतो. कैक वेळा हे सगळं सोडून द्यावं असं वाटलं तरी त्या डिग्रीकडे नजर लावून दिवस ढकललेले असतात. अशा शेकडो-हजारो मुलांचं स्वप्न पूर्ण व्हायला काही दिवस उरले, आणि कोविड-19 नावाच्या जागतिक साथीने सगळं जगणं उलटं पालटं करून टाकलं.हातातोंडाशी करिअर आलेल्या मुलांचं भवितव्य या कोविडमुळे अचानक अनिश्चित दिसायला लागलं. इतके दिवस नसलेल्या अडचणींचे डोंगर त्यांच्यासमोर उभे राहिले. आत्ताच इतक्या लोकांच्या नोक:या जाण्याच्या बातम्या ऐकू येतायत, त्यात या नवीन ग्रॅज्युएट्सना नोकरी कोण देणार? दिली तरी पगार काय मिळणार?  मुळात कोविड-19 ने सगळं जग उलटंपालटं केल्यानंतर भविष्यात कुठल्या करिअरला स्कोप असेल? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आज तरुण मुलांच्या समोर नाही. इतकंच नाही, तर ज्यांच्याकडे सगळी उत्तरं आहेत असं वाटत होतं, त्या  सिनिअर्सकडेही फारशी उत्तरं नाहीयेत. कारण आज निर्माण झालेले प्रश्नच नवीन आहेत.आजवर हा प्रश्न असा सोडवला जायचा, असं केलं की प्रॉब्लेम सुटतो असल्या विधानांना काही अर्थ उरलेला नाहीये. सगळं जग सैरभैर होऊन एकेमकांकडे बघतंय. अशा वेळी तरु ण मुलांनी कुठे बघावं? - तर त्याची उत्तरं शोधयला मदत करणारा एक संवाद अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तरु ण मुलांशी साधला होता. ग्रॅज्युएशन-2क्2क्, या तरुण मुलांच्या ग्रॅज्युएशन सोहळ्यात ऑनलाइन त्यांनी भाषण केलं. पदवी मिळणं किती खास असतं हे सांगितलं.त्यात ते जे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे.

बराक ओबामा तरुणांना सांगताहेत...

बराक ओबामा म्हणाले की मी सिनिअर पिढीचा प्रतिनिधी असल्यामुळे आजच्या तरुण मुलांनी काय करावं हे मी सांगायला जाणार नाही. पण त्याबद्दल मी तीन सल्ले नक्की देईन. ते सल्ले बघा, तुम्हालाही उपयोगी पडतात का?

1. घाबरू नकासमोर आत्ता कुठलंही चित्न स्पष्ट दिसत नसलं तरी त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपल्या जगाने यापूर्वी याहून भयंकर संकटांना तोंड दिलेलं आहे. दोन महायुद्ध, प्लेगसारखे भयानक साथीचे रोग, दुष्काळ, पूर, 193क् सालासारखी महाबेरोजगारी अशी अनेक संकटं जगाने आजवर पचवलेली आहेत आणि त्या प्रत्येक संकटातून जग पुन्हा उभं राहिलं आहे.  त्यामागचं प्रमुख कारण हे आहे, की त्या प्रत्येक वेळी त्यावेळची तरुण पिढी त्यांच्या नवीन जगाबद्दलच्या कल्पना घेऊन नेतृत्व करायला पुढे आली.त्यांनी त्या त्या वेळच्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे घाबरू नका. 

2. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा

आत्ताच्या जगासमोरचे प्रश्न इतके नवीन आणि जटिल आहेत, की ते सोडवायला जुनी उत्तरं उपयोगी ठरणार नाहीत. त्यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं त्याचा विचार करा. तुम्हाला कुठली तत्त्वं महत्त्वाची वाटतात? प्रामाणिकपणा, न्याय्य वागणूक, समानता, लिंगभेदभाव न करणं अशा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणा:या गोष्टी ठरवा. तुमच्या तत्त्वांशी तडजोड न करता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक असाल, तर तुमचा प्रवास नक्की योग्य दिशेने होईल.

3. समूह / समाजगट बनवातुम्हाला जे योग्य वाटतं, ते करण्यासाठी समविचारी लोकांचा समूह बनवा. कारण आजवर आपण बघितलं तर लक्षात येतं, की कुठलंही मोठं काम एकटय़ा दुकटय़ाने उभं राहत नाही. आत्ताच्या काळात, चारही बाजूंनी संकट आलेलं असताना आपल्यापुरतं बघण्याची इच्छा होणं नैसर्गिक आहे. पण हीच वेळ आहे एकमेकांना धरून राहण्याची. कारण या आलेल्या संकटानेच आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, की आपल्या आजूबाजूची माणसं जर भुकेली असतील, तर मी एकटा / एकटी किती कमावतो / कमावते याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे माणसं जोडा. त्यांच्यासह वाटचाल करण्याचा प्रयत्न करा.

( गौरी मुक्त पत्रकार आहे.)