शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मु.पो.म्हसवड : आयुष्य सरळ पण नाय चालत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 05:55 IST

गेल्या चार महिन्यांपासून मावशीबरोबर छावणीत राहणारी खमकी नगाबाई. बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. लिंगवरेचा हणमंत खांडेकर. नऊ जनावरांसह गेले चार महिने छावणीतच राहतोय. 16 वर्षाचा सुदर्शन ढेकळे आणि 17 वर्षाचा सचिन बोडरे बारावीची परीक्षा झाली तसे छावणीत कामाला लागले. दुष्काळ मोठा कडक पण त्याहून मोठी आहे, या पोरांची हिंमत भेटा त्यांना....

- प्रगती जाधव-पाटील

दुष्काळी भागातलं स्थळ आलं तर आधी त्याला प्राधान्य देईन, असं सांगणारी नगाबाई. मोठा भाऊ सैन्यात जाणार, मग घरी आईबापाकडं बघायला कोण नाय म्हणून मी गावातच राहीन, असं सांगणारा सुदर्शन. मळणी यंत्रात बोट सापडल्यामुळे सैन्यात जायला स्वतर्‍ अनफिट असला तरीही इतरांना प्रेरणा देणारा हणमंत.हे भारीच पोरं रखरखत्या उन्हात भेटले. दुष्काळ.. कोरड.. कडाक्याचं ऊन.. कठीण परिस्थिती हे असले शब्द आम्हाला हरवू शकत नाहीत. निसर्गानं या मातीत जन्माला घातलंय आणि तितक्याच कणखरपणानं आम्हाला जगण्याचं बळपण दिलंय. आम्ही जे आहोत, जसे आहोत त्यात खुश आहोत.. लोकांची किव करणारी नजर आणि उपकार करण्याची भाषा आम्हाला बोचते. निसर्गाच्या कोपातून बाहेर पडण्यासाठी आम्ही परस्परांची मदत घेतोय. तेच आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तुमच्यासाठी ही उन्हात रखरखणारी छावणी असेल; पण आम्ही या पसरलेल्या छावणीत जिवाची मुंबई करतोय. नो टेन्शनवाली..!असं हे पोरं बोलतात आणि आपण काय ऐकतोय यावर कानांचा विश्वासच बसत नाही.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात 19 चारा छावण्या अस्तित्वात आहेत. यात साधारण तीस हजार जनावरे आणि 7 हजार नागरिक विविध ठिकाणांहून येऊन राहत आहेत. यात सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचाही यात समावेश आहे. जानेवारी महिन्यात सातार्‍यातील पहिली चारा छावणी 120 एकर क्षेत्रात म्हसवड येथे सुरू करण्यात आली. बस स्टॅण्ड परिसरात या विषयीची माहितीही देण्यात आली होती. ठिकठिकाणी मिळालेल्या माहितीचा प्रचार आणि प्रसार होऊन या छावणीत जनावरं आणि अनोळखी माणसं एकत्र येऊ लागली. आणि नात्यागोत्याची असल्यासारखी एकमेकांसह राहू लागली.गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मावशीबरोबर छावणीत आलेल्या नगाबाई भिवाजी जिमल ही गावची पोरगी वयापेक्षा अधिक परिपक्व वाटली. लग्नानंतर नांदायला जायचं म्हटलं तर सुकाळ का दुष्काळ कोणता भाग निवडणार यावर म्हणते, ‘आमीच आमच्या भागाला नावं ठेवली तर आमच्या भावंडांची लग्न कशी व्हायची. दुष्काळी भागात नको म्हणून आमच्या घरात सुना कशा यायच्या? इतल्या पोरांना पोरी कोण देणार? आम्हीच आमचा भाग नाकारून नाय चालणार. आहो मोकळ्या वातावरणात रहायचं जे सुख आम्ही इथं घेतो ते मोठय़ा शहरात पर्यटनाच्या नावाखाली विकत घ्यावं लागतं. हा दोन-चार महिने जातात त्रासाचे; पण आयुष्य समदं सरळ पण नाय चालत ना?’नगाबाई छावणीत आल्यापासून इथं असणार्‍यांची गाडी शिकली, आता घरातून काही आणायचं असेल तर ती गाडीवर स्वतर्‍ जाऊन आणते.***बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. त्याला खूप शिकायचं आहे. उन्हाळ्याच्या सुटीत त्याला कौशल्य व्यवसाय शिकायचं होतं; पण त्याची छावणीत डय़ूटी लागली आणि तो इथंच राहू लागला. आपल्या वयाच्या सवंगडय़ांबरोबर धम्माल मस्ती करणं, छावणीलगत असलेल्या मैदानावर व्यायाम करणं हे त्याचं काम. म्हणाला, हे पण कौशल्य शिक्षणच चाललंय की माझं!  काही त्रागा नाही की चिडचिड नाही. ***

 आटपाडी तालुक्यातील लिंगवरेचा हणमंत तानाजी खांडेकर हा 23 वर्षाचा युवक घरच्या नऊ जनावरांसह गेले चार महिने या छावणीत तळ ठोकून आहे. लष्करात जाण्याची तीव्र इच्छा होती. शारीरिक क्षमतावाढीचा सरावही त्याने मन लावून केला. गोळाफेक तर तो लीलया करतो. काम करत असताना मळणी यंत्रात हाताचं एक बोट सापडलं आणि मिल्ट्रीत जाण्याच्या स्वप्नावर ‘मेडिकली अनफिट’चा ठपका लागला. दुष्काळी भागात नोकरी, रोजगार नाही म्हणून सैन्यात जायचं, असं नाही. सैन्यात भरती होण्याकडे पोटापाण्याचा प्रश्न म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून पाहिले जाते. हणमंतच्या मामासह सात नातेवाईक सैन्यात आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हणमंतही ध्येयाच्या मागे धावत होता. आता तो घरची शेती सांभाळतो. दहापैकी पाच एकर शेतीत अन्नधान्य पिकते. पाण्याच्या परिस्थितीमुळे नऊ जनावरं घेऊन तो या छावणीत आहे.*** अवघ्या 16 वर्षाचा सुदर्शन रावसाहेब ढेकळे हा भेटला. म्हसवडच्या पंचक्रोशीतूनच सुदर्शन आलेला. त्याच्या गावातील बहुतांश लोक मुंबईत रंगाच्या व्यवसायात काम करतात. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. पेपर संपल्या-संपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो छावणीत दाखल झाला. त्याचा थोरला भाऊ सैन्यात भरतीसाठी प्रय} करतोय. सुदर्शनला ‘तू ही भरती होणार का?’ असं विचारलं तर तो चक्क नाही म्हणाला. आणि सांगू लागला,  ‘मला शेतकरी व्हायचंय! ‘घरी कोणीतरी नको का? थोरला भाऊ सैन्यात दाखल होणार म्हटल्यानंतर गावी आईवडिलांजवळ कोणीतरी पाहिजे ना!’***

गंगोती, ता. माण येथील सचिन बोडरे (वय 17) हा छावणीत भेटलेला युवक सैन्यात भरती होण्यासाठी जोरदार सराव करतोय. दुष्काळी परिस्थिती पाचवीला पूजलेली. तालुक्यात रोजगाराची फारशी संधी नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचा गुण येथील मातीतूनच माणसांना मिळालेला. सचिनही त्याला अपवाद नाही. म्हसवडच्या छावणीत राहत असतानाही तो माणदेशी फाउण्डेशनतर्फे  चालविण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलात सैन्य भरतीत फिट होण्याच्या ध्येयामागे तो धावतोय. दुष्काळी परिस्थिती ही येथील तरुणाईची कमजोरी नाही तर ताकद वाटते झगडण्याची आता इथं पोरांना.ही धमक पाहून खरंच वाटत नाही की दुष्काळी चारा छावणीत आहोत, संकट मोठं डोक्यावर मात्र त्याहून मोठी या तरुण पोरांची हिंमत या छावणीत भेटते.

( प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)