शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह स्टोरीत व्हायरस

By admin | Updated: February 11, 2016 20:01 IST

जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे तर आजही प्रेमात अडसर आहेतच. आणि ते इतके भीषण आहेत की, त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत.

 
कुठून प्रेमात पडलो असं वाटावं 
इतकी भांडणं सतत होतात
कारण प्रेमाला छळणारे 
आणि त्यासाठी टपून बसलेले
काही शत्रू आपल्याच पिढीनं
जन्माला घातले आहेत.
ते आपल्याला घेरताहेत 
आणि आपल्या प्रेमावर
मेणचट काजळी धरताहेत
हे अनेकांच्या लक्षात येतं 
तोवर त्यांचा ब्रेकअप 
होऊन गेलेला असतो.
ते हे प्यार के नए दुश्मन
 
प्यार के दुश्मन हजार.
जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे तर आजही प्रेमात अडसर आहेतच. आणि ते इतके भीषण आहेत की, त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत.
आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको म्हणून किती मुलंमुली सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात, हे आपल्या समाजातलं वास्तव आहेच.
मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही, तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही.
अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात, कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत.
ते आपल्याला घेरताहेत आणि आपल्या प्रेमावर मेणचट काजळी धरताहेत हे अनेकांच्या लक्षात येतं तोवर त्यांचा ब्रेकअप होऊन गेलेला असतो.
सध्या तरुण मुलांना घेरणारे हे प्यार के नए दुश्मन.
नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.
अॅण्टी व्हायरस ज्यानं त्यानं आपापल्या पर्सनल लाइफमध्ये स्वत: इन्स्टॉल करावेत.
पण निदान हे व्हायरस कोणते हे तरी लक्षात ठेवलेलं बरं !
 
1) वेळ आहे कुठं ?
प्रेमाबिमात पडतात पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. कुणी दोन लांबच्या शहरात, देशातही. फोनवर बोललं की भांडणच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यामुळे वेळ नाही, एकमेकांना समजून घेता येत नाही. त्यातून गैरसमज वाढत जातात.
 
2) पझेसिव्हनेस
प्रेमात पङोसिव्हनेस असतोच. तो येतोच. पण किती यावा. आपल्यापलीकडे त्यानं/तिनं कुणा मित्रमैत्रिणीशी बोलूच नये. कुणाबरोबर बाहेर फिरायला जाऊ नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात.
 
3) सोशल मीडिया
काहीही. सोशल मीडिया कसा काय शत्रू असू शकतो? पण तो आहे खरं. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं या सगळ्यातून गैरसमज वाढू लागतात. आणि परिणाम, भांडण-वाद-वैताग.
 
4) ओव्हर शेअरिंग
तुम दिल मै धडकन, दो जिस्म एक जान वगैरे फिल्मी बोलणं सोपं असलं, तरी प्रत्यक्षात असं सतत एकमेकांच्या जगण्याचा भाग होणं हे जरा जास्तच छळकुटं होऊ लागलं आहे. त्यातून सतत शेअरिंग. खाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की नात्यातला सरप्राईज एलिमेण्टच संपून चाललाय. आणि ओव्हर शेअरिंग हीच समस्या बनते आहे.
 
5) टाइमपास
अनेक जणांना प्रेम हा एक खेळ वाटतो. कमिटमेण्ट करायची नसते. त्यातून मग त्या नात्याला स्थैर्य येत नाही. आणि हा टाइमपास किमान एकाच्या तरी प्रेमाचा खेळखंडोबा करतो.
 
6) करिअरची स्पर्धा
आता समवयीन मुलंमुली, त्यांच्या महत्त्वाकांक्षाही सारख्याच. करिअर एकाचवेळी सुरू होतं. अनेक जणांत तर त्यातून नकळत स्पर्धाही सुरू होते. त्यातून कुणी कुणासाठी कॉम्प्रमाईज करायचं यावरुन वाद होतो. आणि मग ही स्पर्धा प्रेमाचा बळी घेते.
 
7) स्पेसची मागणी
प्रेमात अखंड तर बुडायचं, पूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम पण हवं, मात्र त्यात स्पेसही हवी असं त्रंगडं सध्या होऊन बसलं आहे. त्यामुळे एकीकडे मुलींना प्रियकरानं आपले लाडकोड करावेत, आपल्याला स्पेशल फील करवावं असं वाटतं. दुसरीकडे, त्यानं आपल्या इंडिपेडण्ट असल्याचाही मान राखत योग्य स्पेस द्यावी असंही वाटतं. नेमका हा समतोल मुलांना साधता येत नाही आणि लव्ह स्टोरीत दी एण्ड येतो.
 
 
- अजिंक्य सोनारीकर