शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यापूर्वीची वसाहत खिळखिळी

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

मारूती कदम ,उमरगा जनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.

मारूती कदम ,उमरगाजनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.येथील राष्ट्रीय महामार्गालगत नगर पालिकेच्या शेजारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १९३० साली चुनखडीच्या सहाय्याने ४८ घरांची उभारणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली १२ घरे बांधण्यात आली. एकूण दोन एकर जागेच्या परिसरात ६० घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्याकाळी मर्यादित कुटुंब संख्या समजून घेवून बांधण्यात आलेली घरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तुटपूंजी पडू लागली आहेत. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या या घरांच्या भिंतीचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. एकूणच जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाल्याने पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जागेत नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.पाठपुरावा सुरुयेथील पोलिस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. या घरात पोलिस कर्मचाऱ्यांना राहणे त्रासदायक झाले आहे. पालिकेच्या नळपट्टीचा भरणा करुनही एकाही घराला पालिकेने अद्याप नळ कनेक्शन केले नाही. वसाहतीच्या उभारणीबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी लेखी पत्रव्यवहार करुनही उपयोग होत नाही. आमच्याकडे दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी बजेट नाही हे एकच उत्तर गेल्या अनेक वर्षापासून दिले जात आहे. याबाबत नूतन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनाही माहिती देण्यात आली असून, सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पोलिस ठाण्याच्या वतीने पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली.