शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीतून थेट खेडय़ात

By admin | Updated: May 21, 2015 19:53 IST

इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग

खेडय़ात काय ठेवलंय?
- नुस्ता अंधार!!
त्यापेक्षा शहरं बरी! 
‘कितीही झाला कहर तरी सोडू नये शहर!’
- अशी म्हण का उगाच पडली असेल? शिक्षण संपलं किंवा शिकायलाच जे शहरात जायचं ते परत खेडय़ात यायचंच नाही, सटीसहामाशी जत्रेला, दिवाळीला यायचं आणि एरव्ही किती सुंदर ते घर कौलारू याचे कढ काढत बसायचे.
- अशा मानसिकतेत काही पिढय़ा जगल्याच! आजची तरुण पिढीही त्याला अपवाद नाही, उलट आता तर कुणालाच खेडय़ात रहायचं नाही, सगळे शहरात निघालेत अशीच स्थिती!
शहरात काही हजारो रुपयांच्या नोक:या नाहीत की जगण्याची सारी सुखं नाहीत. दहा बाय दहाची खोकडी घरं आणि गर्दीतले धक्के, अवास्तव स्पर्धा यासा:यात श्वास गुदमरून घ्यायचा. पण रहायचं शहरातच आणि म्हणायचं खेडय़ात काही पर्यायच नाहीत!
पण,
हे पर्याय शोधायचे कुणी?
- कारण शोधलं 
तर पर्याय आहेत!
आणि ते इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग आणि मल्टिनॅशनल कंपन्या भारतीय ग्रामीण भागाकडे ‘ह्यूज पोटेन्शियल’ म्हणून पाहत आहेत. शाश्वत आणि समविकासाच्या कल्पनेत आता ग्रामीण भागातच नवे उद्योग व्यवसाय सुरू करायला भारत सरकारही चालना देत आहे. कार्पोरेटवाले तर मोठी संधी सापडल्यासारखे शहरांकडून ग्रामीण भागाकडे निघायच्या तयारीत आहेत!
कारण या सा:याच्या मुळाशी आहे एक नवं क्षेत्र, ज्याचं नाव आहे, डेव्हलपमेण्ट सेक्टर!
आणि त्या सेक्टरमधला एक नवाच घटक आहे, ग्रामीण उद्योजकता. सामाजिक उद्योगांनी सुरू झालेला हा प्रवास आता ग्रामीण उद्योगांर्पयत येऊन पोहोचला आहे आणि मुख्य म्हणजे तो पूर्णत: प्रोफेशनल होतो आहे. वाटलं म्हणून जमवलं भांडवल आणि केला एखादा लघु उद्योग सुरू, इतकी ही कल्पना भाबडी नाही. उलट उद्योजकतेचं पूर्ण प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याचं हे एक नवीन करिअरच उदयास येत आहे.
आणि त्या वाटेवर आजतरी काही तरुण स्वत:हून आपलं ग्रामीण उद्योजकतेचं करिअर घडवायला निघाले आहेत.
ग्रामीण भागात ज्याची पायाभरणी होते आहे आणि ग्रामीण उद्योजकता म्हणून जे नवीन क्षेत्र आकार घेतंय त्याचीच ओळख या अंकात आपण करून घेतो आहोत.
मात्र हे नक्की देशभरातल्या नामांकित आयआयटी ते केंद्र सरकार या सर्व टॉपमोस्ट टप्प्यात ग्रामीण भागात जाऊन उद्योग करणं आणि देशात नव्यानं उद्योगांची पायाभरणी करणं, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.