शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक विनोदाचा 'बाय गो बाय'

By admin | Updated: November 19, 2015 04:38 IST

दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय‘ हा माझा पहिला चित्रपट असला, तरी यापूर्वी सहायक दिग्दर्शन केलं आहे. तो अनुभव गाठीशी होता. तांत्रिकदृष्ट्या पूर्वतयारी झालेली होती.

दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित होत असताना काय भावना आहेत?
- दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय‘ हा माझा पहिला चित्रपट असला, तरी यापूर्वी सहायक दिग्दर्शन केलं आहे. तो अनुभव गाठीशी होता. तांत्रिकदृष्ट्या पूर्वतयारी झालेली होती. सुरेश देशमाने, परेश मांजरेकर, सलील अमृते यांच्यासारखी अनुभवी मंडळी सोबत असल्याने दडपण आलं नाही.
निर्मिती सावंत, विजय पाटकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करण्याचा अनुभव कसा होता?
- फारच सुंदर अनुभव होता. निर्मितीताई आणि विजय पाटकर यांनी माझ्या कथेवर विश्वास दाखवला. माझा विचार पक्का असल्याने, त्यांनी प्रत्यक्ष कामातही खूप सहकार्य केले. त्यांच्यासह नयन जाधव, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, प्रशांत चौडप्पा हेही कलाकार तितकेच महत्त्वाचे आहेत. या सर्वांनीच मला हवं होतं तसंच काम केलं. महत्त्वाची बाब म्हणजे, निर्माते प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी कामात पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मोकळेपणाने काम करता आलं.
इतर विनोदीपटांपेक्षा ‘बाय गो बाय’ वेगळा कसा?
- ‘बाय गो बाय’ हा नेहमीच्या विनोदी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. प्रासंगिक विनोद हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. महाराष्ट्रावर निर्मिती सावंत या नावाचं गारूड आहे. मात्र, त्यांची या चित्रपटातील भूमिका अत्यंत वेगळी आहे. या चित्रपटाची ठेवण वेगळी आहे, मांडणीची शैलीही वेगळी आहे. दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे त्याची हाताळणी करण्यात आली आहे.
पहिला चित्रपट दिग्दर्शित करताना फिल्म फेस्टिवल वगैरे डोळ्यासमोर ठेवले जातात. तुम्हाला तसा प्रयत्न करावासा नाही वाटला का?
- मुळात, कलात्मक आणि व्यावसायिक अशी वर्गवारी करणेच आवडत नाही. कलात्मक चित्रपटांइतकेच व्यावसायिक चित्रपटासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यातूनही सामाजिक संदेश दिला जातो. ‘बाय गो बाय’ विनोदी चित्रपट असला, तरी त्यातही सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला आहे. स्त्रियांना काय सहन करावे लागते, एखाद्या चुकीचे काय परिणाम होऊ शकतात, याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार केला आहे.
बदलत्या मराठी चित्रपटांविषयी काय सांगाल?
- खूप चांगले बदल होत आहेत. आता मराठी आणि हिंदी चित्रपटांत फरक राहिलेला नाही. मराठी चित्रपट प्रत्येक बाजूवर सक्षम आहे, तसेच व्यापक स्तरावर प्रदर्शितही होत आहे. सगळ्याच अर्थाने मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.

मुलाखत : विजय पगारे, दिग्दर्शक