शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 07:50 IST

इंग्लिश मीडिअम पाहिजे, ब्रॅण्डेड गॉगल पायजे, शूजना चिखल नाय लागला पायजे, हे सगळं आईबापाच्या पैशावर मिळवता येईल! पण पुढं काय? टिकाल कसं नव्या जगात?

ठळक मुद्देकाळ्या आईला त्यांनी सांभाळलं, तिनं त्यांना भरभरून दिलं. अस्सल हीरो असा घडतो.

- मिलिंद थत्ते

मागच्या पिढीत अशी फॅशन होती की, मुलाखतीला जाताना किंवा नोकरीच्या ठिकाणी जाताना सूट-बूट-टाय घालून जायचं. आताच्या पिढीत अशी फॅशन ग्रामीण भागात आलीय की गावोगावच्या शाळेतील मुले गळ्यात टाय लावून शाळेत जातायत. याउलट जे देश पूर्वी टायवाले होते, त्यांनी आता ते सोडलंय.आयआयटीसारख्या एखाद्या लयभारी क्रीम विद्यापीठात गेलात तर असं दिसेल की बहुसंख्य विद्यार्थी गोल गळ्याचे गबाळे टीशर्ट आणि पाऊण पॅण्ट (कापरी का काय म्हन्त्यात ते) घालून हिंडत असतात. काही प्रोफेश्वरही अशा वेशात किंवा खादीचा झब्बा किंवा साधी शर्टपॅण्ट घालून असतात. एकही माणूस सूट-बूट-टाय घालून दिसत नाही. इंग्रजांची नक्कल करायला आमच्या पूर्वीच्या पिढय़ांनी हा टायचा फास गळ्यात घालून घेतला होता. आपल्यासारख्या गरम हवामानाच्या देशात अंगाला चिकटणारे घट्ट निबर कपडे घालणं हे मूर्खपणाचं आहे. हे हळूहळू बुद्धिमान लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी या नकला करणं सोडून दिलं. आम्ही गावातली मानसं मात्न आताच त्या खड्डय़ात पडलोय !दोस्तहो, हा खड्डा फक्त टायचा नाही, आपण करत असलेल्या सर्वच नकलांचा आहे. आपले सगळे लक्ष इंटरनेटवरून दिसणार्‍या एका काल्पनिक जगात अडकलं आहे. आपल्या हाताशी काय आहे, आपली मुळं कुठे रुजली आहेत हे न पाहता आपण नुसत्या नकला करतो आहोत.हे म्हणजे सिंहाच्या छाव्याने मेंढय़ांच्या कळपात राहून मेंमें करण्यासारखं आहे. आम्हाला इंग्लिश मीडिअम पाहिजे, ब्रॅण्डेड गॉगल पायजे, शूजना चिखल नाय लागला पायजे, हे सगळं आईबापाच्या पैशावर मिळवता येईल !पण त्यानंतर काय?इंग्लिश बोलता येईल; पण त्याचा जगायला उपयोग शून्य!ज्याने आपली मुळं ओळखली, तो जग कितीही कसंही बदललं तरी टिकू शकतो. आपण ज्या गावात राहतो, तिथली माती-पाणी-जंगल आणि तिथल्या माणसांची त्याबद्दलची समज - ही आपली मुळं आहेत. ही कधी आपल्याला सोडून जाणार नाहीत. त्यांना आपण संपत्ती मानतो की कचरा? यावर आपलं भविष्य ठरणार आहे.ज्ञानेश्वर बोडके यांचं नाव ऐकलंय तुम्ही? पदवीधर झाल्यावर नोकरी करताना ज्ञानेश्वरभाऊंच्या लक्षात आलं की, या नोकरीत आपण खुरडणार. त्यांनी पुन्हा शेतीकडे वळायचं ठरवलं. आपली माती-पाणी-माणसं ओळखली आणि ठरवलं की शेतकर्‍याला एका एकरातून रोज एक हजार रुपये मिळाले पाहिजे. भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा अभिनव फार्मर क्लब त्यातून उभा राहिला. ज्ञानेश्वरभाऊ आताही मोडकंतोडकंच इंग्लिश बोलतात; पण त्यांच्या क्लबचा घसघशीत नफा त्यांच्यामागे उभा असतो. त्यांच्या शब्दाशब्दातून ओसंडणारा आत्मविश्वास त्यांची मुळे घट्ट असल्यातून येतो. लहानपणी टाय लावून इंग्लिश शिकायला ते गेले नव्हते. कुणी तरी आपल्याला पोसेल अशा आशेवर ते राहिले नाहीत. मातीत उभे राहिले. काळ्या आईला त्यांनी सांभाळलं, तिनं त्यांना भरभरून दिलं. अस्सल हीरो असा घडतो.