शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!

By स्वदेश घाणेकर | Updated: January 17, 2023 14:37 IST

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला...

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला...  सिकंदर शेखला ( Sikandar Shaikh) जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, पण उपांत्य फेरीत तो पराभूत झाला अन् वादाला तोंड फुटले... पंचांचा निर्णय अंतिम असतो हे आपण ऐकतो, पण त्यांच्याकडूनही चुका होतात आणि म्हणून विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यावरही आता विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न महाराष्ट्र केसरीतील प्रकारामुळे उपस्थित होतोय... असो हा वादाचा मुद्दा सोडला तर महाराष्ट्राचे मल्ल हे केवळ 'महाराष्ट्र केसरी' अन् 'हिंद केसरी' या दोन स्पर्धांपुरतेच मर्यादित राहिलेले दिसत आहेत... भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचे सुपूत्र होते हे आपण अभिमानाने सांगतो... पण, त्यांचा हा वारसा पुढे चालवणारा एकही मल्ल आज आपल्या मातीत जन्म घेऊ शकला नाही, ही शोकांतिका आहे.

महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या मल्लावर बक्षीसांचा वर्षाव केला जातो. त्याला सरकारी नोकरीची घोषणा केली जाते अन् तिथेच आपले मल्ल बळी पडतात. एकदा का सरकारी नोकरीचा शिक्का लागला, तर कशाला हवंय ऑलिम्पिक पदक अन् काय? बऱ्याच वर्षांपूर्वी नरसिंग यादवने ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न दाखवले होते आणि तो ते अस्तित्वात आणेल असा ठाम विश्वासही होता. पण, पठ्ठ्या डोपिंगच्या जाळ्यात अडकला अन् पुन्हा येरे माझ्या मागल्या. राहुल अवारे हा मराठमोळा मल्लही काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिकच्या शर्यतीत आहे असे वाटले होते. पण, पठ्ठ्याने ऑलिम्पिकच्या तोंडावर वजनी गट बदलले.. ( Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!) आता ते का बदलले, नेमकं काय झालं ? याचे उत्तर तोच देऊ शकतो.. 'लोकमत' ने तेव्हा त्याच्याशी याबाबत चर्चा केली होती, तेव्हा तो वजन घटवून ऑलिम्पिक गटात पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला होता... अजून त्याची वाट पाहतोय... आता तोही पोलीस खात्यात चांगल्या पदावर कामाला लागला आहे अन् त्याच्या सोशल मीडियावर कुस्तीचे कमी अन् पोलीस वर्दीतीलच अधिक फोटो पाहायला मिळतात. आता येऊया सिकंदर शेख याच्याकडे त्याच्यावर अन्याय झाला की नाही, यात मतमतांतर असू शकतील. पण, त्याने महाराष्ट्र केसरी सोबत ऑलिम्पिकचेही स्वप्न पाहिले तर खरंच बरं होईल.. आज मुंबई व  नजिकच्या अनेक तालमी ओसाड पडलेल्या पाहायला मिळत आहेत.. .गिरण्या बंद झाल्या अन् कुस्तीची आवड असलेला एक वर्ग मुंबई बाहेर किंवा पुन्हा गावाकडे परतला.. येथे लहान लहान मुलं प्रशिक्षण घ्यायला येतात. पण, त्यांचे स्वप्न राष्ट्रीय स्पर्धांपुरते मर्यादित असते.. राष्ट्रीय स्पर्धा  जिंकायची अन् नोकरीला चिटकायचे, हेच काय ते ध्येय. मग खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालणार कसा. राष्ट्रकुल व आशिया स्पर्धेत अधुनमधून नावं दिसली होती, परंतु ऑलिम्पिक या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेचा आपण कधी विचार करणार? बरं याला केवळ कुस्तीपटूंना दोष देऊन चालणार नाही... सरकारी क्रीडा धोरण सतत बदलत राहतं.. सरकार बदललं की धोरणं बदलली जातात. क्रीडा धोरणात आश्वासनांचा पाऊस पाडला की क्रीडापटू खूश ( हे केवळ कुस्तीपुरतं मर्यादित नाही)... मग काय कोणती स्पर्धा जिंकल्यावर कोणत्या दर्जाची नोकरी मिळते हे ठरवले जाते अने खेळाडू लागतात कामाला.. तिथेच ऑलिम्पिक स्वप्नांचा चुराडा होतो. कुस्तीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर महाराष्ट्रातल्या मल्लांनी ऑलिम्पिकलाही चीतपट केले आहे. त्यामुळे त्यांची स्वप्न मर्यादित आहेत आणि महाराष्ट्राची कुस्ती रसातळाला आहे...

हरयाणाचे वर्चस्व..बजरंग पुनिया,सुशील कुमार, फोगट भगिनी, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, रवी कुमार दहिया हे सर्व हरयाणा किंवा त्या नजिकच्या प्रांतातील खेळाडू आज ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव रोशन करून झालेत आणि यातील काही अजूनही ऑलिम्पिक स्पर्धा गाजवण्याची तयारी करत आहेत. मग यात महाराष्ट्र कुठेय? महाराष्ट्र केसरी मानाची स्पर्धा आहे त्यात वाद नाहीच, पण आपल्या मल्लांनी त्यापेक्षा मोठं स्वप्न पाहायला हवं, तरच येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवता येईल. काहींच्या मते हरयाणा, उत्तर प्रदेश यांची लॉबी स्ट्राँग असल्याने तेथील मल्लांची वर्णी लागते, पण, आपणही कुठे कमी पडतोय याचा विचार व्हायला हवा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Wrestlingकुस्तीPuneपुणेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HaryanaहरयाणाMaharashtraमहाराष्ट्र