शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

...तर कामकाज ठप्प होईल

By admin | Updated: November 2, 2016 07:04 IST

लोढा समितीला पाठविलेल्या पत्राच्या बाबतीत जर समितीने योग्य वेळेत उत्तर न दिल्यास आपले कामकाज ठप्प पडू शकते

नवी दिल्ली : आपल्या कार्यप्रणालीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांकडे पाहता, लोढा समितीला पाठविलेल्या पत्राच्या बाबतीत जर समितीने योग्य वेळेत उत्तर न दिल्यास आपले कामकाज ठप्प पडू शकते, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबरला बीसीसीआयला निर्देश दिल्यानंतर बोर्डाचे सचिव अजय शिर्के यांनी लोढा समितीला पत्राद्वारे पुढील कामकाजच्या पद्धतीविषयी विचारले होते. मात्र, समितीकडून अद्याप याविषयी कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावर बीसीसीआयने भीती व्यक्त करताना सांगितले, की जर समितीची भूमिका अशीच नकारात्मक राहिली, तर निश्चितच बोर्डाचे कामकाज थांबेल.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीसीसीआय लोढा समितीच्या सहमतीशिवाय कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकत नाही. त्यातच या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये आगामी इंग्लंडविरुद्धची द्विपक्षीय मालिका, आयपीएलच्या मीडिया अधिकाऱ्यांशी संबंधित तारखांच्या निर्णयांसह इतर निर्णयांचाही समावेश आहे.सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबरला लोढा समितीला निर्देश दिले होते, की त्यांनी बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहाराची मर्यादा निश्चित करावी. सर्वोच्च न्यायालयाने समितीला आपला आॅडिटर नेमण्यासही सांगितले होते आणि मोठ्या प्रमाणात दिलेल्या पैशांची आणि खात्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते.त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सुनावले होते, की जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींना लागू केले जात नाही, तोपर्यंत बीसीसीआय आपल्याशी संलग्न राज्य संघटनांना कोणत्याही प्रकारे आर्थिक साह्य देऊ शकणार नाही. (वृत्तसंस्था) >इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात?दरम्यान, समितीकडून लवकर उत्तर न आल्यास नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात येणार असल्याचेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, समितीच्या सहमतीशिवाय मालिकेतील सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांना आर्थिक पाठबळ देता येणार नाही, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हटले. याबाबतीत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आम्ही बोर्डच्या कामकाजाच्या स्पष्टीकरणासाठी समितीला ई-मेल पाठवला आहे. मात्र आम्हाला भीती आहे, की समितीने यावर लवकर उत्तर दिले नाही तर बोर्डाचे कामकाज बंद पडू शकते. समितीने कालपर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसून, त्यांच्याकडून याबाबत कोणतेही वक्तव्य झालेले नाही.’’