शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर यांना ‘जीवनगौरव’

By admin | Updated: November 19, 2014 04:07 IST

जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले

मुंबई : भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) यंदाचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, भुवनेश्वर कुमारला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबरला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव आणि सदस्य संजय पटेल यांच्या समितीने वेंगसरकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना या पुरस्कारांतर्गत एक सन्मानचिन्ह, चषक आणि २५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. वेंगसरकर यांनी १९७५-७६ या हंगामात इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. तसेच, १९८३चा विश्वचषक आणि १९८५च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. १९८७ ते ८९ या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व वेंगसरकर यांच्याकडे होते. याव्यतिरिक्त वेंगसरकर २००६ ते ०८ या कालावधीत वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षही होते. लॉर्ड्सवर तीन कसोटी शतक करणारे वेंगसरकर हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या १२६ धावांच्या फटकेबाजीमुळेच भारताने १९८६ मध्ये लॉडर््सवर कसोटी विजय साजरा केला होता. याआधी सचिन तेंडुलकरला (२००६-०७ व २००९-१९) व वीरेंद्र सेहवाग (२००७-०८), गौतम गंभीर (२००८-०९), राहुल द्रविड (२०१०-११), विराट कोहली (२०११-१२) आणि रविचंद्रन अश्विन (२०१२-१३) यांना पॉली उम्रीगर चषकाने सन्मानित करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले असून, त्याला लाला अमरनाथ चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याने ९ सामन्यांत ६६३ धावा आणि २७ विकेट घेतल्या. या पुरस्कारासह त्याला अडीच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्नाटक संघाचा कर्णधार विनय कुमार यालाही सर्वोत्तम अष्टपैलू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विनयने १२ सामन्यांत ११३ धावा व ४० विकेट घेतल्या आहेत. महाराष्ट्राचा मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव याने २०१३-१४ च्या रणजी सत्रात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याला माधव राव सिंधिया पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशचा गोलंदाज ऋषी धवन यालाही सर्वोत्तम गोलंदाज म्हणून माधव राव सिंधिया चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)