शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात पावसाला सुरुवात, भारत - पाकिस्तान सामना रद्द होण्याची भीती

By admin | Updated: March 19, 2016 17:25 IST

कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. ईडन गार्डनवर संध्याकाळी 7.30 वाजता भारत - पाकिस्तान टी-२० सामना सुरु होणार आहे. मात्र पाऊस सुरु असल्याने सामन्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट रसिकांचा पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या सरी अजून थांबलेल्या नाही आहेत. 
 
सकाळपासूनच कोलकात्यातील वातावरण ढगाळ झाले असून अधुनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. दिवसभर हीच परिस्थिती कायम राहू शकते वा वीजांच्या कडकडाटासाह आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती. पाऊस न थांबवल्या सामना रद्द होण्याचं संकट आहे. तर दुसरीकडे कमी षटकांचा सामना खेळवला जाईल अशीही शक्यता आहे. 
 
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात आयसीसी स्पर्धेत पाकविरुद्ध अजिंक्य राहण्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती करण्यासह स्पर्धेतील आशा कायम राखण्याचेही भारतापुढे आव्हान असेल. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामनाच रद्द होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.