शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान बरोबर फायनलसाठी कुठल्याही बदलाची गरज नाही - विराट कोहली

By admin | Updated: June 16, 2017 12:21 IST

पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 16 -  पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय अंतिम फेरीतही तसाच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तानची बलस्थाने आणि कमकुवतपणा ठाऊक आहे. त्यामुळे त्यानुसार रणनीती आखून खेळण्याचा प्रयत्न असेल. 
 
सध्या आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय त्यापेक्षा वेगळे काही करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही असे विराट म्हणाला. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेऊन त्यादिवशी चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल असे विराटने सांगितले. पाकिस्तानला काय संदेश देणार या प्रश्नावर कोहलीने थेट उत्तर टाळले. 
 
असा कुठलाही संदेश देण्याची गरज नाही. तुम्ही फायनल खेळण्यासाठी मानसिक दृष्टया तयार नसाल तर, तुम्ही 100 टक्के फिट आहात किंवा तुम्ही मोठा विजय मिळवून इथवर पोहोचलात याला अर्थ उरत नाही असे कोहली म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी तुम्ही कुठला अंदाज बांधू नका. या स्पर्धेत अनेक आश्चचर्यकारक निकाल पाहायला मिळालेत. आम्ही फायनलमध्ये खेळण्याचा आनंद घेणार आहोत असे कोहली म्हणाला. 
 
आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही कुठलीही गोष्ट गृहित धरणार नाही. आम्ही नऊ विकेटने जिंकलो किंवा एक विकेटने फरक पडत नाही. आम्ही मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा तसेच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करु असे कोहली म्हणाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानी संघाचेही कोहलीने कौतुक केले. पाकिस्तानी संघाने मला प्रभावित केलेय. ते उत्तम क्रिकेट खेळले आहेत असे कोहली म्हणाला.      
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
 
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.