शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यापेक्षा भारतीय संघावर जास्त दबाव - बांगलादेश कर्णधार

By admin | Updated: June 15, 2017 08:08 IST

शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकेल. मी माझ्या सहका-यांना या लढतीकडे उपांत्यफेरी म्हणून नव्हे तर, फक्त एक सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्यफेरी खेळणा-या बांगलादेश संघाचा कर्णधार  मशरफी मुर्तजाने आपल्या संघावर दबाव असल्याचे कबूल केले. आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये प्रथमच बांगलादेशच्या संघाने उपांत्यफेरीत मजल मारली आहे. आम्ही उपांत्यफेरीचा सामना खेळतोय त्यामुळे निश्चित दबाव असणार. पण आमच्यावर जसा दबाव आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त दबाव भारतावर आहे. 
 
भारताची लोकसंख्या आणि क्रिकेटची लोकप्रियता यामुळे भारतावर आमच्यापेक्षा जास्त दबाव असेल असे मुर्तजा म्हणाला. सामन्यापूर्वी आयोजित पत्रकारपरिषदेत त्याने हे विधान केले. 4 बाद 33 असा डाव अडचणीत बांगलादेशने 265 धावांचे लक्ष्य पार करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडसारख्या बलाढय संघावर विजय मिळवून उपांत्यफेरीत पोहोचल्याने बांगलादेशातील क्रिकेटप्रेमींच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत तसेच त्यांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे. 
 
दोन्ही संघांवर अपेक्षांचा दबाव आहे. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकेल. मी माझ्या सहका-यांना या लढतीकडे उपांत्यफेरी म्हणून नव्हे तर, फक्त एक सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे. कारण तुम्ही मनातून उपांत्यफेरीत खेळत आहात असा विचार केला तर नक्कीच तुमच्यावर दबाव वाढेल पण तुम्ही याकडे फक्त एक मॅच म्हणून पाहिले तर तुम्ही अधिक चांगला खेळ करु शकता असे मुर्तजा म्हणाला. 
 
आणखी वाचा 
 
कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे बांगलादेशला विजयाचा दावेदार न समजणे चुकीचे ठरेल. भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांगलादेशने साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता, त्यामुळे या संघाला कमकुवत लेखणे चुकीचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. 
 
भारतीय कामगिरीत सातत्य राखत बांगलादेशला धडा शिकविण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, क्षेत्ररक्षणही चांगले आहे. एकूण विचार करता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ खेळाच्या सर्वच विभागत अव्वल भासत आहे.