शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

भारताची जेतेपदाची किक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 03:06 IST

कर्णधार सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्री किकवर केलेल्या गोलच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला २-१ ने नमवून सॅफ स्पर्धेचे सातव्यांदा अजिंक्यपद पटकाविण्याची किमया केली.

तिरुवअनंतपूरम : कर्णधार सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्री किकवर केलेल्या गोलच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला २-१ ने नमवून दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद पटकाविण्याची किमया केली. तसेच २०१३ मध्ये अफगाणिस्तानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचे उट्टेदेखील काढले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना गोल करता आला नाही. छेत्रीने केलेला हेडर गोलबारला लागून बाहेर गेला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक भूमिका घेतली. जेजेने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला. अफगाणिस्तानच्या जुबेर अमीरी याने ७० व्या मिनिटास गोल करीत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोनच मिनिटांनी छेत्री याने हेडरद्वारे दिलेल्या पासवर जेजे लालपेखलुआने चेंडू गोलजाळ््यात धाडत संघाला १-१ बरोबरी साधून दिली. भारताचा संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दहाव्यांदा अंतिम फेरीत खेळत होता. त्यापैकी सात वेळा जेतेपद मिळविण्यात भारतीय संघाला यश आले आहे. अफगाणिस्तानने नेपाळमध्ये २०१३ मध्ये झालेल्या अंतिम फेरीत भारताला २-० ने पराभूत केले होते. त्याची परतफेड भारताने केली. स्थानिक प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबाजागतिक क्रमवारीत भारत १६६ व्या, तर अफगाणिस्तान १५० व्या स्थानी आहे. अंतिम सामन्यात भारताला स्थानिक प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा लाभला. त्यामुळे विजेतेपदानंतर खेळाडूंनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केले. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या हस्ते भारतीय संघाला चषक देऊन गौरविले.निर्धारित वेळेत दोन्ही संघांना निर्णायक गोल करता आला नाही. अतिरिक्त वेळेत 101व्या मिनिटास छेत्रीने फ्री किकवर गोल करीत मिळवून दिलेली आघाडी निर्णायक ठरली. भारताला आघाडीची दोनदा संधी मिळाली होती, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात खेळाडू अपयशी ठरले.