शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भारताच्या महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरीने

By admin | Published: February 25, 2016 3:52 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या काही महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकली जाणार आहेत.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिकीटविक्रीसाठी एका वेबसाइटशी करार केला आहे. पहिल्या सत्रात बंगळुरू, चेन्नई, मोहाली, कोलकाता व धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटविक्री केली जाणार आहे. मात्र, यामध्ये भारताचे सामने, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश नाही.या संदर्भात ‘बीसीसीआय’ने सांगितले की, तिकिटांची मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यासाठी भारताचे चार सामने, दोन उपांत्य सामने व अंतिम सामन्याची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आॅनलाइन तिकीटविक्रीचे समर्थन केले आहे. ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेची तिकीटविक्रीही या स्पर्धेपासून होण्याची शक्यता आहे. क्रिकेटला विकसित करण्याच्या अभियानांतर्गत ‘बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक स्पर्धा भारत, तसेच जगभरात लोकप्रिय करण्यासाठी मदत करेल,’ असे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ज्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहायचा आहे, त्यांना योग्य प्रकारे तिकीट देण्याची जबाबदारी आमची आहे.- शशांक मनोहर, अध्यक्ष, आयसीसी