शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरीने

By admin | Updated: February 25, 2016 03:52 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील तिकीटविक्रीला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या काही महत्त्वाच्या सामन्यांची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकली जाणार आहेत.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिकीटविक्रीसाठी एका वेबसाइटशी करार केला आहे. पहिल्या सत्रात बंगळुरू, चेन्नई, मोहाली, कोलकाता व धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटविक्री केली जाणार आहे. मात्र, यामध्ये भारताचे सामने, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश नाही.या संदर्भात ‘बीसीसीआय’ने सांगितले की, तिकिटांची मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यासाठी भारताचे चार सामने, दोन उपांत्य सामने व अंतिम सामन्याची तिकिटे लॉटरी पद्धतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आॅनलाइन तिकीटविक्रीचे समर्थन केले आहे. ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेची तिकीटविक्रीही या स्पर्धेपासून होण्याची शक्यता आहे. क्रिकेटला विकसित करण्याच्या अभियानांतर्गत ‘बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक स्पर्धा भारत, तसेच जगभरात लोकप्रिय करण्यासाठी मदत करेल,’ असे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ज्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहायचा आहे, त्यांना योग्य प्रकारे तिकीट देण्याची जबाबदारी आमची आहे.- शशांक मनोहर, अध्यक्ष, आयसीसी