शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा हार्दिक विजय

By admin | Updated: March 24, 2016 00:10 IST

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. २३ - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे. भारताने बांगलादेशला दिलेले १४७ धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशने भारताला झुंजवले. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले. त्यांने टाकलेल्या शेवटच्या षटकात फक्त बांगलादेश संघाला १० धावाच काढता आल्या. पांड्याच्या या षटकात ३ फलंदाज बाद झाले तर २ चौकार गेले. १ चेंडूत २ धावांची गरज असताना पांड्याने चेंडू निर्धाव टाकत भारताला १ धावांने विजय मिळवून दिला.
 
हार्दिक पंड्यानं टाकलेलं अखेरचं षटक चांगलंच नाट्यमय ठरलं. महमुदुल्लानं या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढली, मग दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मुश्फिकउर रहीमनं चौकार ठोकले. अखेरच्या तीन चेंडूंमध्ये बांगलादेशला विजयासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. पण मुश्फिउर रहीम आणि महमुदुल्ला लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले. मग अखेरच्या चेंडूवर धोनीनं मुस्ताफिजूर रहमानला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
या विजयाबरोबरच भारताने बांगलादेशला हरवून विजयाचे रंग उधळले आणि होळी साजरी केली.  भारतातर्फे अश्विन, जडेजा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी २ बळी मिळवले. बांदलादेश तर्फे तम्मीम इक्कबाल ने ३५ धावांचे योगदान दिले, तर मोक्याच्या वेळी मेहमुद्दुला आणि शाकिबने भारतीय गोलंदाजी फोडून काढली होती. पण मोक्याच्या वेळी भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगीरी करत विजय हिराऊन आणला.
 
त्यापुर्वी, बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्नात असलेल्या भारताने बांगलादेशला २० षटकात १४७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताने सात बाद १४६ धावा केल्या. 
फलंदाज रोहित शर्मा १८ धावा काढून बाद झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच शिखर धवन तंबूत परतल्याने पाठोपाठ दुसरा धक्का बसला. शिखर धवनने २३ धावा काढल्या. तर, आक्रमक फलंदाज विराट कोहलीही जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. त्याला २४ धावांवर बांगलादेशचा गोलंदाज शुवागता होमने यष्टीचीत केले. 
या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत ३० धावा केल्या. सुरेश रैना झेलबाद झाल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याही १२ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने घेतला. तर युवराज सिंग अवघ्या ३ धावा काढून तंबूत परतला. रविंद्र जडेजा १२ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ धावा केल्या, तर आर. आश्विनने पाच धावा केवल्या. 
बांगलादेशकडून गोलंदाज अल अमीन हुसेन आणि मुस्तफिजुर रहमानने यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शुवागता होम,  महमदुल्ला आणि शाकीबुल हसन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.