शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल फायनलमध्ये तुफान राडा! प्रेक्षकांचा संताप अन् दगडफेक, अखेर बदलावा लागला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:35 IST

ढाका येथे रंगला होता भारत-बांगलादेश फायनलचा सामना

India vs Bangladesh SAFF U19: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल स्पर्धेत मोठा गोंधळ झाला. परिस्थिती इतकी विचित्र झाली की सुरुवातीला भारतीय संघ विजेता घोषित झाला होता, पण नंतर विजेता बदलण्याची नामुष्की ओढवली. ढाका येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेश समर्थकांनी भारताला विजेतेपद देण्याच्या निर्णयाविरोधात दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यातून विजेता बदलण्याची वेळ आली.

प्रेक्षकांचा संताप का झाला?

ढाका येथे भारत आणि बांगलादेशच्या अंडर-19 महिला संघादरम्यान फुटबॉलचा अंतिम सामना ११-११ असा बरोबरीत सुटला. सामना संपल्यानंतर पंचांनी टॉस उडवून सामन्याचा निकाल ठरवला. हे घडल्यावर टीम इंडियाने चॅम्पियनशिप जिंकली, पण चाहत्यांना ते आवडले नाही. बांगलादेश संघाकडून पेनल्टी शूट आऊटची मागणी सुरु झाली. पण रेफरींनी तसे केले नाही. त्यामुळे चाहते प्रचंड संतापले. त्यांनी मैदानावर दगडफेक केली आणि मैदानावर बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

बदलावा लागला स्पर्धेचा विजेता

या गदारोळात भारतीय संघ आपला विजय साजरा करत होता; ते मैदानाबाहेर जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना मैदान सोडता आले नाही. भारतीय संघ मैदान सोडण्याचा प्रयत्न करत असताना बांगलादेशचा संघ मैदानातच थांबून निर्णयाचा निषेध करत होता, त्यामुळेच समर्थकही मैदानात त्यांच्यासोबत आले आणि गोंधळ वाढत गेला. प्रदीर्घ वादानंतर फेडरेशनला आपला निर्णय बदलावा लागला आणि शेवटी भारत व बांगलादेश या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे विजेते घोषित झाले, तरीही चॅम्पियन्स ट्रॉफी भारतालाच मिळणार आहे.

टॅग्स :India vs Bangladeshभारत विरुद्ध बांगलादेशFootballफुटबॉलSocial Mediaसोशल मीडिया