शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

भारताला २ पदकावर समाधान, योगेश्वर दत्तने केलं निराश

By admin | Updated: August 21, 2016 18:26 IST

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम दिवशी ६५ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाईल प्रकारात पहिल्याच सामन्यात योगेश्वर दत्ताचा मंगोलियाचा पैलवान गांझोरिगने ०-३ अशा फरकाने दारुण पराभव केला.

शिवाजी गोरे  / ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २१ : लंडन आॅलिम्पिकचा कांस्य पदक विजेता योगेश्वर दत्त भारतासाठी शेवट गोड करण्यात अयशस्वी झाला. त्याला मंगोलियाच्या गांझोरीग मंडाखनारनकडून ०-३ गुणांनी पराभव पत्करावा लागला. कारियोका एरीनामधील कुस्ती हॉलमध्ये झालेल्या या लढतीत मॅटवर आल्यापासून योगेश्वर एवढा उत्साहीत दिसत नव्हता. त्याच्यात पूर्वीचा आत्मविश्वास सुध्दा जानवत नव्हता. कुस्ती सुरु झाल्यानंतर त्याने बचावात्मक खेळाला सुरुवात केली. दुसरीकडे गांझोरीग हा आक्रमक खेळ करून डाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातच पहिल्या राऊंडमध्ये गांझोरीगने त्याच्याविरूध्द डाव टाकण्याच्या प्रयत्नात एक गुण मिळविला. तेंव्हा सुध्दा बरोबरी करण्यात योगेश्वर अपयशी ठरला. योगेश्वरने दोन वेळा त्याच्या पटात शिरण्याचा प्रयत्न केला पण, त्याला यश आले नाही आणि गुणांची बरोबरी साधता आली नाही. 

दुसऱ्या राऊंडला सुध्दा गांझोरीगने झटापटी सुरु केली त्याने योगेश्वरला कोणतीही हालचाल करू दिली नाही. योगेश्वर डाव टाकण्यासाठी प्रयत्न करीत होता पण गांझोरीग त्याला दाद देत नव्हता. त्याच वेळी गांझोरीगने पुन्हा डाव टाकताना २ दोन गुण मिळविले आणि गुणांची आघाडी ३-० केली. शेवटच्या मिनिटात योगेश्वर आक्रमक झाला पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता.

पंचांनी अंतिम शिट्टी वाजविली आणि योगेश्वरसह असंख्य भारतीयांचे या स्पर्धेतील तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. ज्या पध्दतीने आज योगेश्वर सुरुवातीपासून खेळत होता त्याच्यावरून शंका येत होती की हा पदक जिंकले की नाही.

 
 
एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकच्या रविवारी शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णनिरोप देईल, अशी देशवासीयांना अपेक्षा होती. पण त्याने निराश केले . भारताने रिओ ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.
 
ऑलिम्पिकसाठी भारताचे १२३ खेळाडूंचे सर्वात मोठे पथक रिओला गेले होते. भारताला किमान १० पदक मिळतील असा विश्वा, व्यक्त केला जात होता. मात्र स्पर्धेच्या शेवटी भारताच्या खात्यावर फक्त २ पदकं आहेत. एक कांस्य आणि एक रौप्य.