शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सामन्यापूर्वी निराश वाटत होते

By admin | Updated: May 28, 2016 03:54 IST

आयपीएल २०१६ ची पहिली क्वालिफायर लढत माझ्यासाठी भीतीदायक स्वप्न आणि सुखद शेवट अशी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही मोठी संधी होती. दुपारी स्टेडियमकडे

एबी डिव्हिलियर्स लिहितो़...आयपीएल २०१६ ची पहिली क्वालिफायर लढत माझ्यासाठी भीतीदायक स्वप्न आणि सुखद शेवट अशी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ही मोठी संधी होती. दुपारी स्टेडियमकडे रवाना झालो त्यावेळी मी माझ्या पत्नीला सांगितले की निराश वाटत आहे. मला चांगले वाटत नव्हते.त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत २० षटकांत गुजरात संघाला १५८ धावांत रोखले; पण त्यानंतर धवल कुलकर्णीने संस्मरणीय स्पेलमध्ये माझ्या संघातील अनेक सहकाऱ्यांना तंबूचा मार्ग दाखवला. दुसऱ्या टोकाला उभा राहून हे बघताना माझ्यावरील दडपण वाढत होते. आम्ही केवळ २९ धावांत पाच फलंदाज गमावले होते. भागीदारी होणे आवश्यक आहे, याचाच विचार करीत होतो. फार पुढचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर धावा कशा वसूल करता येईल, याचा विचार करीत होता. स्टुअर्ट बिन्नीसोबत अशी एक भागीदारी साकार होताना दिसली; पण त्यानंतर तो बाद झाला आणि स्कोअर झाला ६ बाद ६८. त्यानंतर इक्बाल अब्दुल्लाच्या रूपाने चांगला जोडीदार लाभला. तो खेळपट्टीवर आला त्यावेळी शांत होता. त्याने मला स्ट्राईक देण्यावर भर दिला आणि संधी मिळाल्यावर चेंडूला सीमारेषा दाखविताना केवळ माझ्यावरील दडपणच कमी केले नाही तर मला विश्वासही प्रदान केला. आघाडीची फळी कोसळल्यानंतरही सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असल्याचा मला विश्वास होता. टी-२० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. त्यानंतर आम्ही एकेरी-दुहेरी धावा घेत लक्ष्याचा समीप जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरम्यान, खराब चेंडूला सीमारेषा दाखविण्यास प्राधान्य दिले. एकवेळ आम्हाला जोखीम पत्करणे गरजेचे झाले होते. त्यावेळी पावसाचे सावट निर्माण झाले होते. कर्णधार कोहलीने मैदानावर संदेश पाठविला की १५ व्या षटकानंतर आक्रमक खेळ करणे आवश्यक आहे. हा निर्णय योग्य ठरला. आम्ही त्या षटकात १४ धावा वसूल केल्या.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा जल्लोष मंगळवारी अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक होता. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत स्टेडियममध्ये एवढा आवाज ऐकलेला नाही. इक्बालने सलग तीन चौकार ठोकल्यानंतर स्टेडियम या जल्लोषाचा एक भाग झाले. हा एक चांगला सांघिक प्रयत्न होता. आरसीबी व्यवस्थापनाचे अधिकारी, प्रशिक्षक आणि संघातील सर्वंच खेळाडू अंतिम फेरी गाठण्यामुळे खूश होते. आता आम्हाला जेतेपद पटकावण्याची गरज आहे. (टीसीएम)