शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

'सन्मानामुळे वाढली जबाबदारी, उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 01:31 IST

पद्मश्रीचे मानकरी गौतम गंभीर, सुनील छेत्री, बजरंग पुनिया यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली : गौतम गंभीर क्रिकेटरपासून ‘भला माणूस’ बनू इच्छितो. सुनील छेत्रीमध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळताना आणखी मोठी कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मल्ल बजरंग पुनिया याने याहून मोठी कामगिरी करण्यासाठी देशवाासीयांचे आशीर्वाद मागितले आहेत.केंद्र शासनाने ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रातील या दिग्गजांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून पद्मश्री सन्मान जाहीर केला. या खेळाडूंनी पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना टिष्ट्वटरद्वारे व्यक्त केली आहे. दोनदा विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य राहिलेला गौतम गंभीर टिष्ट्वट करीत म्हणाला,‘हा असा सन्मान आहे, ज्याचा आभारासह स्वीकार करतो. या सन्मासोबतच जबाबदारी येते. मी त्या दिवसासाठी जगत आहे, ज्या दिवशी माझ्यातील भला माणूस क्रिकेटपटूला मागे टाकेल तो माझा दिवस असेल. त्या दिवशी मी स्वत:ला पुरस्कृत करेन.’राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीने टिष्ट्वट केले,‘ माझे कुटुंबीय आणि चाहते या सन्मानाचे हकदार ठरतात. मात्र सध्यातरी निवृत्तीचा इरादा नाही. कृतज्ञ होण्याचे आणखी एक कारण मिळाले. अनेक वर्षे साथ देणारे सहकारी खेळाडू, कोचेस, स्टाफ, मसाजर, फिजियो, आणि व्यवस्थापन या सर्वांचा हा पुरस्कार आहे. मला नेहमी प्रेरित करणारे आई, वडील, बहिणी आणि मित्रांना पुरस्कार समर्पित करतो. देशासाठी खेळणे सुरू राहणार आहे. देश आणि क्लबसाठी खेळताना मैदानावर पाय ठेवेन त्यावेळी माझ्यातील चांगल्या कामगिरीची भूक आणखी वाढलेली असेल. दरदिवशी चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न देखील सुरूच राहणार आहेत.’आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनियाने लिहिले,‘ प्रतिष्ठेच्या पद्म सन्मानाने गौरव होणे माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे. चाहत्यांचे प्रेम आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या हातात हा सन्मान आला.आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी आणखी कठोर सराव करणार आहे. मला प्रेरणा आणि आशीर्वाददेत राहा.’ (वृत्तसंस्था)हा सन्मान‘खास’: शरथ कमलदोनदा पद्म पुरस्कारापासून वंचित राहिलेला दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरीमुळे हा सन्मान मिळाल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी‘खास’ असल्याचे शरत म्हणाला.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरत म्हणतो,‘ हा माझा पहिला नागरी सन्मान आहे.काल रात्री बातमी कळली तेव्हा मित्रांसोबत होतो. फोनची बॅटरी डाऊन झाली होती. घरी परतलो तेव्हा आनंदाचे वातावरण होते. मागच्या वर्षीच्या कामगिरीच्या बळावरच हा सन्मान मला मिळू शकला.’जकार्ता आशियाडमध्ये टेबल टेनिसमधील ६० वर्षांचा दुष्काळ संपविताना शरतने जपानला नमवून भारतीय पुरुष संघाला कांस्य जिंकून दिले शिवाय मनिका बत्रासोबत मिश्र दुहेरीचेही कांस्य पटकविले होते. नव्या विश्व टेटे क्रमवारीत शरत सर्वोत्कृष्ट ३० व्या स्थानावर आला. याच महिन्यात त्याने नववे जेतेपद पटकवून राष्टÑीय जेतेपदाचा कमलेश मेहतांचा विक्रम देखील मागे टाकला.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSunil Chhetriसुनील छेत्री