शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधारपद प्रदीर्घ कालावधीत न मिळाल्याने निराश : तेंडुलकर

By admin | Updated: March 14, 2015 00:07 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते,

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते, असा गौप्यस्फोट केला आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने.तेंडुलकरवर त्याच्या २४ वर्षांच्या चमकदार कारकिर्दीदरम्यान दोनदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली; परंतु त्यात तो फारसा यशस्वी ठरला नाही. तो पहिल्यांदा १९९६ मध्ये कर्णधार झाला; परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे त्याला १९९७ मध्ये या पदावरून हटवण्यात आले. तथापि, कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याची खंत सचिन तेंडुलकरने शुक्रवारी व्यक्त केली.तेंडुलकर म्हणाला, ‘‘क्रिकेट हा वैयक्तिक नसून सांघिक खेळ आहे. एक वेळ येते तेव्हा कर्णधार त्याची भूमिका बजावतो. तो मैदानावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतो; परंतु अखेर फलंदाजांनाच धावा उभाराव्या लागतात आणि गोलंदाजांना योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागते. कर्णधारपद भूषवण्याच्या माझ्या सुरुवातीच्या कालखंडातील १२ ते १३ महिन्यांनंतर पदावरून हटवण्यात आले, ही बाब निराशाजनक होती. कारण तुम्ही संघाला पुढे न्याल, या विचारानेच तुम्हाला कर्णधार बनवले जाते आणि जर तुमचा कार्यकाळ प्रदीर्घ नसला तर यशाचा दर शून्य होतो. तुम्ही चार सामने खेळता आणि त्यातील दोन सामने जिंकलात तर तुमच्या यशाचा दर ५० टक्के होते. कर्णधार म्हणून माझा कालावधी प्रदीर्घ नव्हता आणि त्यातून सावरणे माझ्यासाठी खूपच मोठे आव्हान होते.’’सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या नेतृत्वाची तुलना भारताच्या २०११ च्या इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्याशी केली. तेंडुलकरला सध्या आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ जिंकेल? असा प्रश्न छेडण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारताची सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याकडे वाटचाल सुरू आहे. भारत ज्याप्रमाणे खेळत आहे त्यावर आपण खूप प्रभावित आहोत. आम्ही चांगली गोलंदाजी करीत आहोत आणि फलंदाजी व क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. असा कोणताही विभाग नाही, की ज्यात आमची कामगिरी खराब होत आहे. आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत.’’तेंडुलकर फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वनडेतील नियमात झालेल्या बदलाबाबत जास्त खूश नाही.तो म्हणाला, की क्रिकेटमध्ये बदल होत आहे आणि हे बदल गोलंदाजांसाठी जास्त कठोर आहेत. जेव्हा सर्कलच्या आत पाच क्षेत्ररक्षक होते तेव्हा स्कोर २६० किंवा २७० पर्यंत पोहोचत होता. आता ही धावसंख्या ३१० पर्यंत पोहोचली आहे. एवढेच नव्हे; तर २९० धावांचाही यशस्वीपणे पाठलाग होऊ शकतो, असे समालोचक म्हणतात. (वृत्तसंस्था)