शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

धोनी, विराट आणि सौरवमध्ये हे आहेत समान गुण

By admin | Updated: June 16, 2017 15:21 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे. फलंदाज म्हणून संघाच्या विजयात त्यांचे जितके योगदान आहे तितकेच कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या उभारणीत या तिघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन महान फलंदाजांमध्ये कर्णधार म्हणून काही समान गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत  समान गोष्टी. 
 
- सौरव गांगुलीपासून ख-या अर्थाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली. सौरवने टीम इंडियामध्ये जिंकण्याची जिद्द, आक्रमकता निर्माण केली. कर्णधारपदी असताना सौरवने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा आणि एमएस धोनी या युवा क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला. एखाद-दुस-या खराब परफॉर्मन्समुळे त्यांना संघातून डच्चू दिला नाही. परिमाणस्वरुप आज हे सर्व खेळाडू वर्ल्डक्लास प्लेयर्स म्हणून ओळखले जातात. 
 
- एमएस धोनी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा हाच गुण आहे. 2011 वर्ल्डकप नंतर धोनीने नव्याने संघ बांधला. त्याने रविंद्र जाडेजा, आर.अश्विन यांना वारंवार संधी देऊन आत्मविश्वास निर्माण केला. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी विराटला एक तरुण संघ मिळाला. विराटही आज त्याचप्रमाणे केदार जाधव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यावर विश्वास ठेवत आहे. 
 
- 1999 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने 183 धावांची विक्रमी खेळी केली. वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक आहे. चामिंडा वास, मुरलीधरन या लंकेच्या अव्वल गोलंदाजाचा सौरवने अक्षरश कचरा केला होता. 
 
- सौरव प्रमाणेच धोनीनेही 2005 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये नाबाद 183 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे 299 धावांचे लक्ष्य गाठताना 15 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. 
 
- 2012 साली आशियाकपमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली होती. विराटच्या 183 धावांच्या खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. 
 
- धोनीच्या तुलनेत सौरव आणि विराट प्रचंड आक्रमक आहेत. आक्रमकता जसा दोघांना प्लसपॉईंट आहे तसेच शांतपणा धोनींचा प्लसपॉईंट आहे. संघाला गरज असताना तिघांनी नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. 
 
- सौरव आणि विराट नेहमीच प्रतिस्पर्ध्यांच्या शाब्दीक बाचबाचीला पुरुन उरले आहेत.