शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘चक दे..’तील ‘कबीर’ बनला हरेंद्रसिंह यांच्यासाठी प्रेरणा

By admin | Updated: December 23, 2016 01:22 IST

आपल्या कारकिर्दीत पावला-पावलावर अपमानाचा आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर एक चॅम्पियन संघ तयार करण्याची प्रेरणा

नवी दिल्ली : आपल्या कारकिर्दीत पावला-पावलावर अपमानाचा आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर एक चॅम्पियन संघ तयार करण्याची प्रेरणा ‘चक दे इंडिया’मधील शाहरुखच्या भूमिकेमुळे मिळाल्याचा उलगडा ज्युनिअर हॉकी वर्ल्डकप चॅम्पियन भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी आज केला. त्या चित्रपटातील प्रशिक्षक कबीर खानची भूमिका मनात खोलवर रुतून बसल्याचेही हरेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाने लखनौत नुकत्याच झालेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्डकपमध्ये बेल्जियमला धूळ चारत तब्बल १५ वर्षांनी अजिंक्यपद पटकावले. गेल्या दोन वर्षांपासून संघ तयार करीत असलेल्या हरेंद्र यांनी म्हटले, ‘भारतात हॉकी हा भावनेशी जुळलेला विषय आहे आणि आमच्या रक्तात हॉकी आहे. देशवासीयांना आपल्या भूमीवर विजयाची भेट देणे हे भारतीय हॉकी पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक होते. याविषयी आपल्या कारकिर्दीत अनेक बाबींना सामोरे गेल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्याचा माझ्यावर दबाव होता व माझ्यासाठी यापेक्षा मोठे व्यासपीठ कोणते असू शकलेच नसते. ही माझ्यासाठी शेवटची संधी होती.’
ते म्हणाले, ‘आम्ही वर्ल्डकप जिंकला नसता तर मी हॉकीशी सर्व नाते तोडून फक्त एअर इंडियात नोकरी करण्याचा निश्चय केला होता.’ बिहारमधील छपरा जिल्ह्यातील हरेंद्र यांनी ‘चक दे इंडिया’तील हॉकी प्रशिक्षक शाहरुख आपल्यासाठी प्रेरणास्थान राहिल्याचे सांगितले.
१00 वेळेस पाहिला
‘चक दे इंडिया’ चित्रपट
हरेंद्रसिंह म्हणाले, ‘मी आणि माझ्या मुलाने १00 पेक्षा जास्त वेळेस ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट पाहिला. जेव्हा हा चित्रपट पाहायचो तेव्हा ही आपलीच कथा असल्याचे मला जाणवले. प्रशिक्षक कबीर खानप्रमाणेच मलादेखील अपमानाचा सामना करावा लागला; परंतु त्याच्याप्रमाणेच मी भावनाप्रधान आणि जिद्दी आहे आणि मी काहीतरी करून दाखविण्याचा निश्चय केला होता. मी आधुनिक हॉकीची कौशल्ये शिकलो. गेल्या दोन वर्षांत मानसिक आणि शारीरिकरूपाने संघाला तयार केले आणि हॉकी इंडियाचेही मला पूर्ण सहकार्य मिळाले. हा संघ स्वत:साठी नाही, तर फक्त देशासाठी खेळतो. यात कोणी पंजाब, झारखंड अथवा ओडिशाचा नव्हे, तर सर्व भारताचे खेळाडू आहेत. या विजयाचा परिणाम २0१८ सीनिअर वर्ल्डकपमध्येदेखील पाहायला मिळेल.’
आपल्या कारकिर्दीतील संघर्षाविषयी ते म्हणाले, ‘मी १९८२ला आशियाई स्पर्धेनंतर प्रथमच हॉकीत आलो तेव्हा माझ्याकडे स्टीकदेखील नव्हती. मी झाडांच्या काड्याची स्टीक करून हॉकी खेळत होतो. मी जेव्हा प्रथमच हॉकी खेळण्यास गेलो तेव्हा माझी हॉकी स्टीक फेकून देण्यात आली आणि आता बिहारी आणि आॅटो रिक्षावालेदेखील हॉकी खेळतील, असा टोमणा त्या वेळेस मारण्यात आला.
रॉटरडम येथे ११ वर्षांपूर्वी हरेंद्रसिंह हे प्रशिक्षक असताना भारतीय संघ स्पेनविरुद्ध ज्युनिअर वर्ल्डकपच्या कांस्यपदक लढतीत पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला होता आणि हा पराभव हरेंद्रसिंह यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. हरेंद्रसिंह यांना आगामी योजनेविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘मी कधी समाधानी होऊन बसत नाही; परंतु आता तर सुरुवात आहे आणि अनेक ध्येयनिश्चित करायचे आहे. मला माझ्या संघावर विश्वास आहे आणि हा संघ आॅलिम्पिक सुवर्णदेखील जिंकू शकतो.’