शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Asian Games 2018: धनुर्विद्येत थोडक्यात हुकल्या 'सुवर्ण'संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:04 PM

दोन सांघिक रौप्य, वैयक्तिक स्पर्धांत मात्र निराशा

ठळक मुद्देरजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

ललित झांबरे : जाकार्ता-पालेमबांग आशियाडमध्ये भारताने 15 सुवर्णपदक पटकावून आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली, पण धनुर्विद्येत नशिबाने साथ दिली असती तर सोळावे आणि कदाचित सतरावेसुध्दा सुवर्णपदक आपल्या नावे लागून आतापर्यंतची आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदली गेली असती परंतु, पुरुष आणि महिला, दोन्ही गटात सांघिक कम्पाउंड प्रकारात आपले सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकले. 

 बलाढ्य कोरियासोबतच्या सुवर्ण पदकाच्या लढती एवढ्या अटीतटीच्या झाल्या की एकवेळ भारतीय पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकल्याच्या बातम्यासुध्दा झाल्या होत्या परंतु पंचांनी पुन्हा एकदा टारगेटची पाहणी केली आणि गेल्यावेळी जिंकलेल्या सोन्याच्या जागी चांदीचे पदक हाती आले. 

रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

त्याच त्रिमूर्तीने यावेळी अंतिम फेरीत 229-227 अशी बाजी मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते परंतु, पंचांनी पुन्हा एकदा पाहणी केल्यावर कोरियाचे दोन नेम नऊच्या ऐवजी 10 गुणांच्या जागी लागलेले असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे लढत 229-229 अशी बरोबरीवर आली. म्हणून मग शूटआऊट फेरी घेतली गेली.

 तोडीस तोड स्पर्धा बघा,  त्यातही स्कोअर 29-29 बरोबरीवर राहिला म्हणून मग ज्यांनी परफेक्ट टेन शॉट अधिक मारले तो विजेता या नियमाचा आधार घेतला गेला आणि कोरियाने बाजी मारली तर  चौहान, सैनी व वर्माच्या टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

पुरुषांप्रमाणेच ज्योती सुरेखा वेन्नम, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांच्या संघानेही अंतिम फेरी गाठली. यादरम्यान फिलिपीन्स व तैवानसारख्या तगड्या संघांना त्यांनी मात दिली. अंतिम फेरीतही त्यांनी बलाढ्य कोरियाला दिलेली झुंज कौतुकास्पद होती पण, शेवटी 231- 228 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकच हाती लागले. मधुमिता व मुस्कान या शेवटी-शेवटी परफेक्ट टेन करु न शकल्याने ही सुवर्णसंधी हुकली. 

कम्पाउड संघाची ही कामगिरी वगळता रिकर्व आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या तिरंदाजांनी निराशा केली. पदकाची आशा असलेली दीपिका कुमारी पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेत ढेपाळली. अतानु दासनेही निराशा केली. 

त्यामुळे चार वर्षांपूर्वी धनुर्विद्येत आपली जी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्यपदकाची कमाई होती ती यावेळी फक्त दोन रौप्यपदकांपूरतीच मर्यादीत राहिली.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाIndiaभारत