शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:31 IST

भारताच्या हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीपने 1 गोल करत भारतीय संघाची पकड मजबुत केली.

पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हरमनप्रीतच्या दोन आणि आकाशदीपच्या एका गोलच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला. पाकिस्तानच्या जुनैदने पाकिस्तानकडून एकमेव गोल केला. हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेत पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही.

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करत प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली.

भारताचा आक्रमक खेळसामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या गोलपोस्टवर सतत हल्ले केले, मात्र पाकिस्तानच्या बचावफळीने भारताला उत्तम बचाव करत तीनवेळा गोल करण्यापासून रोखले. पाकिस्तानचा गोलरक्षक अली अमजदने दोन अप्रतिम बचाव केले.

हरमनप्रीतने दुसरा गोल केला

स्पर्धेत पाकिस्तानला प्रथमच पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. नीलम संजीवच्या चुकीमुळे पाकिस्तानला ही संधी मिळाली, मात्र सूरज कारकेराने डाव्या पायाने चेंडू रोखून त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. काही वेळातच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल करत टीम इंडियाची आघाडी मजबूत केली. या सामन्यातही पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण इथेही गोल करता आला नाही.

एशियाडमध्ये दोन्ही संघ नऊ फायनल खेळले

भारत आणि पाकिस्तान या आधी सात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हॉकी फायनलमध्ये आमनेसामने आले होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी एकमेकांविरुद्ध एकूण नऊ फायनल खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने सात आणि भारताने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. दोन्ही देशांनी 1956 ते 1964 पर्यंत सलग तीन ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये भारताने दोन, तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.

गेल्या वेळी हे दोन्ही संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी टप्प्यात आमनेसामने आले होते आणि तेव्हाही भारताने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तान, कोरिया आणि बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांत 14 गोल केले आहेत. भारत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने जपानसोबत गोलशून्य बरोबरी साधली आणि भारताविरुद्धच्या पराभवानंतर चौथ्या स्थानावर आहे.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तान