शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अरुण भारद्वाज मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करणारे पहिले भारतीय अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:19 PM

महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांत ५६० किलोमीटर अंतर १६६ तासांत धावून पार

मुंबई : आंतरराष्ट्रीय मल्टि-डे रेसचे एकमेव भारतीय विजेते अरुण कुमार भारद्वाज यांनी अलीकडेच मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांना जोडणारा  ५६० किलोमीटरचा विनाथांबा प्रवास त्यांनी ३१ जानेवारी, २०२१ रोजी सुरू केला आणि १६६ तासांत पूर्ण केला.  चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video

गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी दीर्घ अंतराची अनेक रनिंग टायटल्स जिंकली आहे. हा रन त्यांनी व्यायाम व धावण्याच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्दिष्टाने सुरू केला. लोकांना आपल्या कृतीद्वारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारद्वाज यांनी हा मार्ग निवडला, कारण, त्यांना धावण्याती आव्हानांना सामोरे जायला आवडते व हा मार्ग उष्मा आणि तीव्र चढणीचे घाट यांच्यामुळे आव्हानात्मक आहे. या मार्गातील १४ किलोमीटर लांबीचा कसारा घाट तीव्र चढणीचा आहे आणि हा घाट सर्वांत खडतर घाटांपैकी एक समजला जातो. ६.५ दिवसांच्या या रनमध्ये अरुण यांनी दिवसाला सरासरी ८० किलोमीटर अंतर कापले आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या रनमध्ये अनेक लोक त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्यासोबत काही किलोमीटर धावले.  India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

भारतातील पहिल्या काही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त केलेल्या एण्ड्युरन्स रनर्सपैकी एक असलेले अरुण भारद्वाज या रनबद्दल म्हणाले, “भारतात रनिंगची संस्कृती गेल्या काही वर्षांपासून वेग घेऊ लागली आहे. आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश देण्यासोबतच अल्ट्रा-मॅरेथॉन रन्स आपल्या भविष्यकाळातील क्रीडापटूंना ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने तयारीमध्ये मदत करतील. मी धावतो, कारण, मला अधिकाधिक लोकांना रनिंगची प्रेरणा द्यायची आहे आणि माझ्यातील क्रीडापटूला कष्ट करण्यासाठी तसेच तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी नवीन आव्हाने हवी असतात. मला माझ्या मुलींसाठीही रोल मॉडेल व्हायचे आहे.”

दिल्लीचे रहिवासी असलेले अरुण यांना काही दिवसांत शेकडो किलोमीटर अंतर धावून पार करण्याची सवय आहे. लेहमार्गे कारगिल ते कन्याकुमारी हा ४१०० किलोमीटर्सचा रन त्यांचा सर्वांत आवडता आहे. हे अंतर कापण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी अनेक दीर्घ पल्ल्याचे रन्स पूर्ण केले आहेत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत केलेल्या ‘सिक्स-डे रेस’मध्ये त्यांनी दक्षिण आशियामधील विक्रम प्रस्थापित केला होता.

टॅग्स :MumbaiमुंबईNashikनाशिक