शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:58 IST

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली.

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली. खेळातील कारभारात झालेल्या सुधारणेचे परिणामदेखील पुढे येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय खेळाडू इतके प्रतिस्पर्धी कधीच नव्हते. सध्या मात्र सर्वोत्तम मानांकनात आहेत. ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्याकडे संधी आहे. कोरोना काळात त्यांनी शिस्तबद्ध तयारी केली. मागच्या २० वर्षांच्या तुलनेत जे स्रोत अलीकडे उपलब्ध झाले त्यातून सर्वात चांगले खेळाडू घडू शकले. नेमबाजी संघानेदेखील उपलब्ध झालेली आर्थिक मदत आणि इतर सुविधांचा पुरेपूर वापर केला.

असे म्हटले जाते की, ऑलिम्पिक चळचळ ही स्पर्धेपेक्षा मोठी असते. येथे उत्कृष्टता, मैत्री आणि आदर ही मूल्ये खेळाडूंना विशेष बनवितात. केवळ पदक जिंकण्यासाठी खेळतो असे नाही तर आम्ही आमच्या देशाचे आणि ऑलिम्पिकचे राजदूत म्हणून येथे वावरतो. खेळाइतके सामर्थ्य दुसऱ्या कशातच नाही.खेळात कसे जिंकता येईल हे तर शिकतोच, पण समोरच्याला कसे पराभूत करता येईल, हे देखील शिकतो. नियमांचे प्रामाणिकपणा आणि सचोटीचे पालन करणे शिकतो. एक ध्येय ठेवणे आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे शिकतो. इतरांचे ऐकणे आणि त्यांना सन्मान देणे शिकतो. आमचा समाज इतरांचे ऐकत नसेल तर खेळाच्या माध्यमातून आपण इतरांचा आदर करू या. त्यांच्याशी मैत्री वृद्धिंगत करू या...

थोडे मागे जाऊ या. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये माघारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या टार्स्क फोर्सने भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली. याचे श्रेय खेळाडूंना द्यावे लागेल. गेल्या चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. या काळात आम्ही आमच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत राहिलो. आधी काय होतो, यापेक्षा पुढचा दिवस कसा चांगला राहील, याचा नेहमी विचार केलेला बरा. गेल्या काही वर्षांत सकारात्मक गोष्टी घडल्या. सहकार्याची भावना आपल्याला अधिक झेप घेण्यास बळकट करेल, अशी आशा करू या.

- ऑलिम्पिकची मूल्ये खेळाडूला आयुष्याचा मार्ग शिकवितात. म्हणूनच खेळाडूंचे वर्तन समाजासाठी प्रासंगिक ठरावे. पदके जिंकणे विलक्षण असते, पण खेळाची खरी शक्ती क्रीडा स्पर्धेच्या निकालाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव पाडत असते.

- याबाबत अद्‌भूत असे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. इटालियन नेमबाज आणि तिहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन निकोलो कॅंप्रियानी यांच्यासोबत सुरू असलेला माझा शरणार्थी प्रकल्प. हे कार्य माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे. यातील काही जण टोकियो स्पर्धा करतील. त्यांचे आयुष्य बदलले. विचलित, दु:खी मानव ते क्रीडापटू! त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ध्येय. आपण म्हणू शकतो की, खेळाने त्यांच्या आयुष्याला कलाटणीे दिली.

(अभिनव बिंद्रा हे चॅम्पियन नेमबाज असून, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचे १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्ण विजेते आहेत.) 

टॅग्स :Shootingगोळीबार