शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:58 IST

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली.

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली. खेळातील कारभारात झालेल्या सुधारणेचे परिणामदेखील पुढे येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय खेळाडू इतके प्रतिस्पर्धी कधीच नव्हते. सध्या मात्र सर्वोत्तम मानांकनात आहेत. ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्याकडे संधी आहे. कोरोना काळात त्यांनी शिस्तबद्ध तयारी केली. मागच्या २० वर्षांच्या तुलनेत जे स्रोत अलीकडे उपलब्ध झाले त्यातून सर्वात चांगले खेळाडू घडू शकले. नेमबाजी संघानेदेखील उपलब्ध झालेली आर्थिक मदत आणि इतर सुविधांचा पुरेपूर वापर केला.

असे म्हटले जाते की, ऑलिम्पिक चळचळ ही स्पर्धेपेक्षा मोठी असते. येथे उत्कृष्टता, मैत्री आणि आदर ही मूल्ये खेळाडूंना विशेष बनवितात. केवळ पदक जिंकण्यासाठी खेळतो असे नाही तर आम्ही आमच्या देशाचे आणि ऑलिम्पिकचे राजदूत म्हणून येथे वावरतो. खेळाइतके सामर्थ्य दुसऱ्या कशातच नाही.खेळात कसे जिंकता येईल हे तर शिकतोच, पण समोरच्याला कसे पराभूत करता येईल, हे देखील शिकतो. नियमांचे प्रामाणिकपणा आणि सचोटीचे पालन करणे शिकतो. एक ध्येय ठेवणे आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे शिकतो. इतरांचे ऐकणे आणि त्यांना सन्मान देणे शिकतो. आमचा समाज इतरांचे ऐकत नसेल तर खेळाच्या माध्यमातून आपण इतरांचा आदर करू या. त्यांच्याशी मैत्री वृद्धिंगत करू या...

थोडे मागे जाऊ या. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये माघारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या टार्स्क फोर्सने भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली. याचे श्रेय खेळाडूंना द्यावे लागेल. गेल्या चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. या काळात आम्ही आमच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत राहिलो. आधी काय होतो, यापेक्षा पुढचा दिवस कसा चांगला राहील, याचा नेहमी विचार केलेला बरा. गेल्या काही वर्षांत सकारात्मक गोष्टी घडल्या. सहकार्याची भावना आपल्याला अधिक झेप घेण्यास बळकट करेल, अशी आशा करू या.

- ऑलिम्पिकची मूल्ये खेळाडूला आयुष्याचा मार्ग शिकवितात. म्हणूनच खेळाडूंचे वर्तन समाजासाठी प्रासंगिक ठरावे. पदके जिंकणे विलक्षण असते, पण खेळाची खरी शक्ती क्रीडा स्पर्धेच्या निकालाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव पाडत असते.

- याबाबत अद्‌भूत असे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. इटालियन नेमबाज आणि तिहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन निकोलो कॅंप्रियानी यांच्यासोबत सुरू असलेला माझा शरणार्थी प्रकल्प. हे कार्य माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे. यातील काही जण टोकियो स्पर्धा करतील. त्यांचे आयुष्य बदलले. विचलित, दु:खी मानव ते क्रीडापटू! त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ध्येय. आपण म्हणू शकतो की, खेळाने त्यांच्या आयुष्याला कलाटणीे दिली.

(अभिनव बिंद्रा हे चॅम्पियन नेमबाज असून, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचे १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्ण विजेते आहेत.) 

टॅग्स :Shootingगोळीबार