शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:58 IST

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली.

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली. खेळातील कारभारात झालेल्या सुधारणेचे परिणामदेखील पुढे येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय खेळाडू इतके प्रतिस्पर्धी कधीच नव्हते. सध्या मात्र सर्वोत्तम मानांकनात आहेत. ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्याकडे संधी आहे. कोरोना काळात त्यांनी शिस्तबद्ध तयारी केली. मागच्या २० वर्षांच्या तुलनेत जे स्रोत अलीकडे उपलब्ध झाले त्यातून सर्वात चांगले खेळाडू घडू शकले. नेमबाजी संघानेदेखील उपलब्ध झालेली आर्थिक मदत आणि इतर सुविधांचा पुरेपूर वापर केला.

असे म्हटले जाते की, ऑलिम्पिक चळचळ ही स्पर्धेपेक्षा मोठी असते. येथे उत्कृष्टता, मैत्री आणि आदर ही मूल्ये खेळाडूंना विशेष बनवितात. केवळ पदक जिंकण्यासाठी खेळतो असे नाही तर आम्ही आमच्या देशाचे आणि ऑलिम्पिकचे राजदूत म्हणून येथे वावरतो. खेळाइतके सामर्थ्य दुसऱ्या कशातच नाही.खेळात कसे जिंकता येईल हे तर शिकतोच, पण समोरच्याला कसे पराभूत करता येईल, हे देखील शिकतो. नियमांचे प्रामाणिकपणा आणि सचोटीचे पालन करणे शिकतो. एक ध्येय ठेवणे आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे शिकतो. इतरांचे ऐकणे आणि त्यांना सन्मान देणे शिकतो. आमचा समाज इतरांचे ऐकत नसेल तर खेळाच्या माध्यमातून आपण इतरांचा आदर करू या. त्यांच्याशी मैत्री वृद्धिंगत करू या...

थोडे मागे जाऊ या. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये माघारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या टार्स्क फोर्सने भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली. याचे श्रेय खेळाडूंना द्यावे लागेल. गेल्या चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. या काळात आम्ही आमच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत राहिलो. आधी काय होतो, यापेक्षा पुढचा दिवस कसा चांगला राहील, याचा नेहमी विचार केलेला बरा. गेल्या काही वर्षांत सकारात्मक गोष्टी घडल्या. सहकार्याची भावना आपल्याला अधिक झेप घेण्यास बळकट करेल, अशी आशा करू या.

- ऑलिम्पिकची मूल्ये खेळाडूला आयुष्याचा मार्ग शिकवितात. म्हणूनच खेळाडूंचे वर्तन समाजासाठी प्रासंगिक ठरावे. पदके जिंकणे विलक्षण असते, पण खेळाची खरी शक्ती क्रीडा स्पर्धेच्या निकालाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव पाडत असते.

- याबाबत अद्‌भूत असे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. इटालियन नेमबाज आणि तिहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन निकोलो कॅंप्रियानी यांच्यासोबत सुरू असलेला माझा शरणार्थी प्रकल्प. हे कार्य माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे. यातील काही जण टोकियो स्पर्धा करतील. त्यांचे आयुष्य बदलले. विचलित, दु:खी मानव ते क्रीडापटू! त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ध्येय. आपण म्हणू शकतो की, खेळाने त्यांच्या आयुष्याला कलाटणीे दिली.

(अभिनव बिंद्रा हे चॅम्पियन नेमबाज असून, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचे १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्ण विजेते आहेत.) 

टॅग्स :Shootingगोळीबार