शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

महामुंबईत १० मार्गावर जलवाहतूक, नव्या विमानतळाला चार मार्ग जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 06:23 IST

सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गांचा सुधारणेसह विस्तार, कोची रेल मेट्रोच्या डीपीआर सादर करणार

नारायण जाधव

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गाचा विस्तार आणि सुधारणेसह नव्या १० मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय मेरिटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मागविलेल्या निविदांना कोची मेट्रो रेलची एकमेव निविदा प्राप्त झाली. त्यांनी डीपीआर सादर केल्यानंतर १० नव्या मार्गावर स्पीडबोटी, रो-रो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार नव्या मार्गानी जोडले जाणार आहे.

जलवाहतूक मार्ग सुरू करण्यात येणार आहेत, त्या भागातील नद्या, खाड्यांची खोली वाढविणे, खडक दूर करणे, प्रवाशांची संख्या, पर्यावरणावर होणारा आघात या सर्वांचा अभ्यास डीपीआर तयार करताना विचारात घेतला जाणार आहे.

प्रदूषणमुक्तीसह इंधनात बचत होणार

मुंबई - नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर-वसई आणि नजीकच्या उरणसारख्या बंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे.

सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचे अंतर जवळ येऊन इंधनासह वेळेचीही बचत होऊन प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

सध्याचे १२ मार्ग

१२ मार्गावर जलवाहतूक सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी तीन मार्ग कागदावरच आहेत. यात न्यू फेरी वॉर्फ-मोरा, न्यू फेरी वॉर्फ-रेवस आणि बेलापूर-नेरूळ कागदावरच आहेत, तर अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, वसई-भाईंदर, वर्सोवा-मढ, गोराई-बोरीवली, बोरीवली- एसेल वर्ल्ड, मार्वे-मनोरी, गेटवे ऑफ इंडिया- मांडवा, गेटवे ऑफ इंडिया- एलिफंटा या मार्गात सुधारणा होईल.

हे आहेत १० नवे मार्ग

वसई ते काल्हेर हा मार्ग वसई-मीरा भाईंदर- फाउंटेन जंक्शन, गायमुख, नागला बंदर, काल्हेर असा असेल.

कल्याण ते कोलशेत मार्गाने

कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाणार आहे.

काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्गावर काल्हेर-मुलुंड-ऐरोली- वाशी-नवी मुंबई विमानतळ ही ठिकाणे असणार आहेत.

वाशी ते नवी मुंबई विमानतळ

बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ

गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई

विमानतळ

गेट वे ऑफ इंडिया ते वाशी

वसई ते मार्वे

बोरीवली ते बांद्रा मार्ग बोरीवली-मार्वे-वर्सोवा- बांद्रा असा असणार आहे

बांद्रा ते नरिमन पॉईंट मार्ग हा बांद्रा-वरळी- नरिमन पॉईंट असा असेल