शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

तालुक्यात आदिवासींचे पाण्यासाठी जागरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 12:31 AM

भक्ताच्या वाडीतील नळपाणी योजनेतून वाडीत पोहोचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमधील भक्ताच्या वाडीतील आदिवासींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढावी लागत होती. त्याच वाडीच्या परिसरात शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे हित महत्त्वाचे असल्याने, स्थानिक आदिवासी पाण्यासाठी रात्रीचा दिवस करायचे. दरम्यान, तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांनी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पांतर्गत पाणीटंचाई निवारण कार्यक्रमामधून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. त्या नळपाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याने भक्ताच्या वाडीत आता पाणी पोहोचले आहे.

कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भक्ताची वाडी येथील ९० आदिवासी घरांची वस्ती आहे. वाडीच्या बाहेर शासनाची शासकीय आदिवासी आश्रम शाळा असून, तेथे एक हजारहून अधिक विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. वाडीमध्ये शासकीय आश्रमशाळा असल्याने आणि आपल्या तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, स्थानिक आदिवासी आपल्या वाडीच्या विहिरीवर पहिले प्राधान्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यामुळे मोग्रज ग्रामपंचायती मधील भक्ताची वाडीतील ग्रामस्थ बऱ्याच वर्षांपासून नळपाणीपुरवठा योजनेची मागणी करत होते. 

येथील महिला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाणी मिळावे, म्हणून आठवड्याचे नियोजन करून रात्रभर विहिरीवर नंबर लावून पाणी भरायच्या. भक्ताची वाडीमधील महिलांनी आपली व्यथा रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांच्या निदर्शनास आणून दिली. भक्ताची वाडीमध्ये नळाचे पाणी येणार नाही, तोवर आपण मते मागायला किंवा कोणत्याही कामासाठी, समारंभासाठी येणार नाही, असे नारायण डामसे यांनी जाहीर केले होते. 

आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनेतून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. या नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि समाज कल्याण समितीचे माजी नारायण डामसे यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्जत पंचायत समिती सदस्या जयवंती दत्तात्रय हिंदोळा, मोगरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन सकपाळ, आंबिवलीचे पोलीस पाटील बाळू खेडेकर, पुरोगामी युवक संघटनेचे महेश म्हसे, अध्यक्ष प्रभाकर रसाळ, तसेच गणेश म्हसे, आंबो आगिवले, काळुराम आगिवले, किरण रसाळ, मंगेश खेडेकर, प्रकाश खेडेकर, नामदेव मराडे,  इंदुमती केवारी, अरुणा शिवाजी  सांबरी उपस्थित होते.

भक्ताचीवाडी मधील पाण्याची समस्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यात महिला भगिनींनी आपल्याला पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विनंती केली असता आपण नळपाणी योजना येत नाही तोवर वाडीत येणार नाही असे आश्वासन दिले होते.ते आश्वासन पाळल्याचा आनंद असून वाडीत पाणी पोहचले हे देखील महत्त्वाचे असून आमच्या आदिवासी बांधवांना विहिरीवर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाही.- नारायण डामसे, सदस्य, रायगड जिल्हा परिषद 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी