शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चोरट्यांनी नऊ वर्षांत पळवली ६७२६ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 03:43 IST

नागरिकांकडून वाहनांच्या बाबतीत फारशी सुरक्षा घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात सक्रिय असलेल्या वाहनचोर टोळ्यांनी मागील नऊ वर्षांत तब्बल ६,७२६ वाहने पळवली आहेत. त्यापैकी अवघ्या १,६४६ वाहनांचाच तपास लागू शकलेला आहे. तर चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये दुचाकी सर्वाधिक असून त्यांच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीची चोरट्यांनी संधी साधलेली आहे.

नवी मुंबईसह मुंबई, ठाणे परिसरात वाहनचोरीची समस्या गंभीर होत चालली आहे. एका शहरात चोरलेली वाहने दुसऱ्या शहरात बनावट कागदपत्राद्वारे विकली जात आहेत. अशा प्रकारच्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या अनेक टोळ्यांना यापूर्वी पोलिसांनी जेरबंद देखील केले आहे. परंतु वाहनचोरीच्या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय, राष्टÑीय तसेच स्थानिक टोळ्या सक्रिय असल्याने हे गुन्हे पूर्णपणे थांबू शकलेले नाहीत. अनेकदा हौस म्हणून देखील वाहनचोरी करून वापरानंतर त्या निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे प्रकार घडतात. मात्र अशा विविध प्रकारातून घडणाºया वाहनचोरीच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील नऊ वर्षात ६७२६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात जड अवजड वाहनांसह कार व दुचाकींचा समावेश असून, त्यापैकी अवघ्या १६४६ वाहनांचा शोध लागू शकलेला आहे. उर्वरित ५०८० वाहनांचा अद्याप पोलिसांना शोध लागू शकलेला नाही.नवी मुंबईसह लगतच्या परिसरातून चोरीला गेलेली वाहने परराज्यात आढळल्याचा प्रकार मागील काही वर्षात समोर आलेला आहे. तर काही राज्यांमधील निवडणुकांपूर्वी महाराष्टÑातून सर्वाधिक वाहनचोरी होत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याकरिता रस्त्यालगत, निर्मनुष्य ठिकाणी उभी असणारी वाहने चोरट्यांकडून लक्ष्य केली जातात. शहरात आजवर वाहनचोरीच्या घडलेल्या घटनांमध्ये रस्त्यालगत, मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवलेली वाहने सर्वाधिक चोरीला गेली आहेत. यामुळे अशा गुन्ह्यांना वाहनमालकांचा हलगर्जीपणा देखील कारणीभूत ठरत आहे. नऊ वर्षात चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ७६५ जड वाहने, १९०७ कार, तर ४०५४ दुचाकींचा समावेश आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यापैकी गावठाणांमध्ये सर्वाधिक बिकट अवस्था असून, नव्याने विकसित झालेल्या नोडमध्ये देखील पार्किंगकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी खेळाची मैदाने, रस्त्यालगतची जागा, रेल्वेस्थानकाबाहेरची जागा, पदपथ तसेच सोसायटी बाहेरच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते. अशावेळी वाहनमालकांकडून वाहनांच्या सुरक्षेची पुरेसी खबरदारी घेतली जाणे आवश्यक असतानाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.महागड्या गाड्या खरेदीवर लाखो रुपये खर्च करणारे, वाहनांमध्ये ५ ते १० हजार रुपयांचे सेफ्टी गॅझेट बसवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.सुरक्षेकडे दुर्लक्ष : दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, वाहनधारकांत असुरक्षितता, कारवाई करण्याची मागणीच्वाहन मालकांमध्ये वाहनांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मागील काही वर्षांपासून पोलिसांमार्फत सातत्याने प्रयत्न होत आहेत.च्वाहनांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रदर्शन देखील भरवले जाते. त्यामध्ये स्मार्ट गॅझेटसह नवनवीन लॉक पहायला मिळतात.च्साधारण २०० रुपयांपासून ते ५ ते १० हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत असते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई