शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

चोरट्यांनी नऊ वर्षांत पळवली ६७२६ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 03:43 IST

नागरिकांकडून वाहनांच्या बाबतीत फारशी सुरक्षा घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात सक्रिय असलेल्या वाहनचोर टोळ्यांनी मागील नऊ वर्षांत तब्बल ६,७२६ वाहने पळवली आहेत. त्यापैकी अवघ्या १,६४६ वाहनांचाच तपास लागू शकलेला आहे. तर चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये दुचाकी सर्वाधिक असून त्यांच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीची चोरट्यांनी संधी साधलेली आहे.

नवी मुंबईसह मुंबई, ठाणे परिसरात वाहनचोरीची समस्या गंभीर होत चालली आहे. एका शहरात चोरलेली वाहने दुसऱ्या शहरात बनावट कागदपत्राद्वारे विकली जात आहेत. अशा प्रकारच्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या अनेक टोळ्यांना यापूर्वी पोलिसांनी जेरबंद देखील केले आहे. परंतु वाहनचोरीच्या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय, राष्टÑीय तसेच स्थानिक टोळ्या सक्रिय असल्याने हे गुन्हे पूर्णपणे थांबू शकलेले नाहीत. अनेकदा हौस म्हणून देखील वाहनचोरी करून वापरानंतर त्या निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे प्रकार घडतात. मात्र अशा विविध प्रकारातून घडणाºया वाहनचोरीच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील नऊ वर्षात ६७२६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात जड अवजड वाहनांसह कार व दुचाकींचा समावेश असून, त्यापैकी अवघ्या १६४६ वाहनांचा शोध लागू शकलेला आहे. उर्वरित ५०८० वाहनांचा अद्याप पोलिसांना शोध लागू शकलेला नाही.नवी मुंबईसह लगतच्या परिसरातून चोरीला गेलेली वाहने परराज्यात आढळल्याचा प्रकार मागील काही वर्षात समोर आलेला आहे. तर काही राज्यांमधील निवडणुकांपूर्वी महाराष्टÑातून सर्वाधिक वाहनचोरी होत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याकरिता रस्त्यालगत, निर्मनुष्य ठिकाणी उभी असणारी वाहने चोरट्यांकडून लक्ष्य केली जातात. शहरात आजवर वाहनचोरीच्या घडलेल्या घटनांमध्ये रस्त्यालगत, मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवलेली वाहने सर्वाधिक चोरीला गेली आहेत. यामुळे अशा गुन्ह्यांना वाहनमालकांचा हलगर्जीपणा देखील कारणीभूत ठरत आहे. नऊ वर्षात चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ७६५ जड वाहने, १९०७ कार, तर ४०५४ दुचाकींचा समावेश आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यापैकी गावठाणांमध्ये सर्वाधिक बिकट अवस्था असून, नव्याने विकसित झालेल्या नोडमध्ये देखील पार्किंगकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी खेळाची मैदाने, रस्त्यालगतची जागा, रेल्वेस्थानकाबाहेरची जागा, पदपथ तसेच सोसायटी बाहेरच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते. अशावेळी वाहनमालकांकडून वाहनांच्या सुरक्षेची पुरेसी खबरदारी घेतली जाणे आवश्यक असतानाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.महागड्या गाड्या खरेदीवर लाखो रुपये खर्च करणारे, वाहनांमध्ये ५ ते १० हजार रुपयांचे सेफ्टी गॅझेट बसवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.सुरक्षेकडे दुर्लक्ष : दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, वाहनधारकांत असुरक्षितता, कारवाई करण्याची मागणीच्वाहन मालकांमध्ये वाहनांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मागील काही वर्षांपासून पोलिसांमार्फत सातत्याने प्रयत्न होत आहेत.च्वाहनांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रदर्शन देखील भरवले जाते. त्यामध्ये स्मार्ट गॅझेटसह नवनवीन लॉक पहायला मिळतात.च्साधारण २०० रुपयांपासून ते ५ ते १० हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत असते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई