शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

शरद पवार यांची साथ सोडणार नाही - नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 1:11 AM

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून सुमारे ४० हजारांचे मताधिक्य मिळाले.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईतून ८० हजार मतांची आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काळाची पावले ओळखून नाईक यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करावा, असा काही कार्यकर्त्यांचा सूर आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी जाहीर केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आत्मकेंद्रित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून सुमारे ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना निसटता विजय मिळाला. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या. नाईक भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत, याबाबत राजकीय गप्पा रंगात आल्या होत्या. याबाबत मौन बाळगून नाईकांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढविला. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था दूर केली.

महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळवित नाईकांनी नवी मुंबईतील सत्ता आपल्याकडे कायम ठेवली; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार संदीप नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराममतदारांचा बदलता कल लक्षात घेऊन नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, पराभव झाला तरी शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी या बैठकीत मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्याचे समजते. यावरून तूर्तास नाईक यांच्याविषयी सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार