शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:40 IST

Sameer Wankhede's bar : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

नवी मुंबई : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरम्यान, परवाना रद्दच्या निर्णयाविरोधात वानखेडे हे न्यायालयात जाणार असल्याचे बारच्या कर्मचाऱ्यांकडून समजते.

समीर वानखेडे हे १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे सद्गगुरू हॉटेल आणि बारचा परवाना काढला होता. मात्र, बार परवाना मिळविण्यासाठी परवानाधारकाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक असतानाही, समीर वानखेडे हे अल्पवयीन असतानाही त्यांच्या नावे बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर १४ डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवाना मिळवण्यासाठी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मागील १८ वर्षांपासून नियमित प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण केला जात आहे. शिवाय प्रत्येक तीन महिन्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारची पाहणी व परवान्याची पडताळणी केली जाते. यावेळी देखील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केला परवाना रद्दठाणे  : वाशी येथे एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर सद्गुरु नावाचा एक रेस्ट्रो बार आहे. त्याचे लायसन्स ठाणे  जिल्हाधिकारी यांनी रद्द केले  आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना ऑक्टोबर १९९७ ला दिला होता. परंतु, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्याने त्याचा परवाना लायसन्स रद्द केल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. तसेच १९९६ मध्ये सिडकोने जी एनओसी दिली होती, तीत या जागेत केवळ रेस्टाॅरंटला परवानगी असून, मद्य विकण्यास मनाई होती. तरीही तिथे मद्यविक्री सुरू होती. या बारचा परवाना ३१ मार्चपर्यंत वैध आहे. शाहरुखच्या मुलाला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते.वानखेडे यांच्या   वयात विसंगतीसज्ञान नसताना बारचा परवाना घेतल्याच्या आरोप होता. यासाठी वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयात विसंगती असल्याचे कारण दिले आहे. बारला परवाना दिला होता, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्यानेच तो रद्द केला. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNavi Mumbaiनवी मुंबई