शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: May 31, 2017 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी

प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१७दरम्यान झालेल्या या परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय बोर्डाने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पसरविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी करण्यात आली असून, पुढील अडीच वर्षे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचा खुलासा मुंबई बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केला. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी अपात्र, १५ विद्यार्थी चौकशीकरिता राखीव, ९ विद्यार्थी आयसोलेटेड विषयांमुळे तर ३ विद्यार्थ्यांचे निकाल हे इतर त्रुटींमुळे राखीव ठेवण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार परीक्षाबंदी लागू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची यंदाची परीक्षा रद्द केली असून, यापुढील पाच परीक्षा देता येणार नसल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. २०२०मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने १७ कॉपी प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विभागातील पुनर्परीक्षार्थी आणि विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीमुळे निकालाचा टक्का घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याची माहिती देताना परीक्षेच्या एक तास अगोदरही अर्ज स्वीकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. परीक्षेच्या दिवशी सकाळी १० वाजता अर्ज करून एका विद्यार्थ्याला वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे परीक्षेला बसविण्यात आले होते.