शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: May 31, 2017 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी

प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१७दरम्यान झालेल्या या परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय बोर्डाने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पसरविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी करण्यात आली असून, पुढील अडीच वर्षे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचा खुलासा मुंबई बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केला. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी अपात्र, १५ विद्यार्थी चौकशीकरिता राखीव, ९ विद्यार्थी आयसोलेटेड विषयांमुळे तर ३ विद्यार्थ्यांचे निकाल हे इतर त्रुटींमुळे राखीव ठेवण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार परीक्षाबंदी लागू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची यंदाची परीक्षा रद्द केली असून, यापुढील पाच परीक्षा देता येणार नसल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. २०२०मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने १७ कॉपी प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विभागातील पुनर्परीक्षार्थी आणि विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीमुळे निकालाचा टक्का घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याची माहिती देताना परीक्षेच्या एक तास अगोदरही अर्ज स्वीकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. परीक्षेच्या दिवशी सकाळी १० वाजता अर्ज करून एका विद्यार्थ्याला वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे परीक्षेला बसविण्यात आले होते.