शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ओबीसींचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण - शंभूराज देसाई

By नामदेव मोरे | Updated: July 15, 2024 00:09 IST

आरक्षणाच्या बैठकीपासून विरोधकांनी पळ काढल्याचा आरोप

मुंबई : ओबीसींचे आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीपासून तीनही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पळ काढला. पण सरकार थांबलेले नाही. आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एकही दिवस वाया घालविला नसल्याचे मत उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.              नवी मुंबईमध्ये पाटण तालुक्यातील रहिवाशांच्या मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणाविषयी मत व्यक्त केले. कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्याला दिले जाणार नाही. ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. शासनाने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे ते कोर्टात टिकेल. कुणबी प्रमाणपत्रासाठीची कार्यवाही सुरू आहे. 

हैद्राबाद संस्थानामधील नोंदी तपासण्यात आल्या आहेत. तेथील सर्व दाखले प्रमाणाीत करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. एक महिन्यापुर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तेव्हापासून आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एक दिवसही वाया घालविलेला नाही. ओबीसी व मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. पण त्या बैठकीपासून तीनही प्रमु्ख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पळ काढल्याची टिकाही त्यांनी केली.

मेळाव्यात बोलताना महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विरोधक खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या नरेटीव्हला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मेळाव्यास शिंदे सेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, विजय माने, यांच्यासह पाटण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMaratha Reservationमराठा आरक्षण