शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:49 AM

पाटबंधारे खात्याचा निर्णय; ४५ गावांतील शेती ओलिताखाली येणार

कर्जत : कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात ४५ गावातील शेती ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यात १५ डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. राजनाला भागातील शेतकºयांना पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी साशंक होते. मात्र, शेतकºयांच्या मागणीचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. १५ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या मुख्य कालव्यात पाणी सोडले जाणार असून, तशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भरत काजळे यांनी दिली आहे.कर्जत तालुक्यातील शेतकरी राजनाला कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी शेती करतात. मागील काही वर्षे राजनाला कालव्याचे दुरु स्तीचे काम सुरू असून शेतकºयांना अनेक वर्षे शेतीसाठी पाणी सोडले जात नव्हते. मागील वर्षी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले; परंतु ते पूर्ण क्षमतेने नसल्याने सर्व भागात पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याअभावी खराब झाली होती. त्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी सोडणार असाल, तर ते सर्व ४५ गावांतील शेतीसाठी आणि पूर्ण क्षमतेने सोडले जावे, यासाठी राजनाला भागातील शेतकरी आक्र मक होते. मात्र, कालव्याच्या दुरु स्तीची कामे आजही अपूर्ण असल्याने पाटबंधारे विभाग त्याबाबत निरु त्तर होता. मात्र, शेतकºयांनी आग्रही भूमिकेने राजनालाचे पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.राजनाल्यात पाणी सोडल्याने उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त भागातील शेतीला पाणी पोहोचेलमुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी डावा कालवा, उजवा कालवा, पाली पोटल कालवा येथून ४५ गावांतील किमान २००० हेक्टर जमिनीत पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाला आहे; पण किती शेतकरी भातशेती करण्यासाठी पाणी वापरणार? याचे उत्तर पाटबंधारे खात्याकडे नाही. कालव्यात सोडले जाणारे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे तेवढे मिळेलच याची खात्री शेतकºयांना नाही आणि पाणी मिळाले नाही तर शेती फुकट जाऊन नुकसान होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे १५ डिसेंबर रोजी पाणी मुख्य कालव्यात सोडल्यानंतर आपल्या जमिनीत कधी येणार यावर शेती करण्याचे नियोजन अवलंबून असणार आहे.१५ डिसेंबर रोजी राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या गावात २० डिसेंबरपर्यंत पोहोचणार आहे. तर राजनाला कालव्यात पाणी सोडणे १४ एप्रिल २०१९ पासून बंद केले जाणार आहे.- भरत काजळे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई